
रोहिणी खडसे यांनी स्पष्ट केलं की निखिल खडसेच्या मृत्यूच्या वेळी एकनाथ खडसे घरीच नव्हते.
निखिल खडसे डिप्रेशनमध्ये होते, त्यांना पाठीचा गंभीर त्रास होता.
या घटनेदरम्यान घरात फक्त आई आणि वहिनी होत्या.
सुसाईड नोट नव्हती; निखिलने हा निर्णय त्या क्षणात घेतला, असा रोहिणी खडसे यांचा दावा आहे.
माजी मंत्री आणि आमदार एकनाथ खडसे यांचे जावई डॉ.प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी काल रेव्ह पार्टीमध्ये रंगेहाथ पकडलं. यानंतर रोहिणी खडसे आणि एकनाथ खडसे यांच्याबाबत बरीच चर्चा रंगली. एकनाथ खडसेंवर त्यांच्या मुलाचा म्हणजेच निखिल खडसेंच्या हत्येचा आरोप होत आहे. पण एकनाथ खडसेंवरच का आरोप होत आहेत? निखिल खडसेंसोबत त्या दिवशी नेमकं काय घडलं? याबाबत रोहिणी खडसेंनी एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
निखिल खडसे यांच्या मृत्यूबाबत रोहिणी खडसे म्हणाल्या, ज्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. त्यादिवशी असं काही वाटलं नव्हतं तो टोकाचं निर्णय घेईल. दिवसभर तो लग्न अटेंड करत होता. त्याने अनेक लग्न अटेंड केले होते. नंतर घरी आला. आई आणि रक्षाबरोबर चहा घेतला आणि बेडरूममध्ये गेला. नंतर रक्षा वहिनी आणि तो दोघेच रूममध्ये होते. त्यांच्या काय चर्चा झाली? हे मला माहिती नाही. तिथे कुणीही नव्हतं.
रक्षा वहिनी नंतर किचनच्या दिशेनं गेल्या आणि अचानक आईला कुणीतरी बंदुकीच्या गोळ्या झाडल्याच्या आवाज आला. तिनं थेट निखिल दादाच्या रूममध्ये धाव घेतली. तेव्हा दादा बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्या दोघींनी सरपंच नारायण चौधरी आणि इतरांना मदतीसाठी फोन केला. कारण त्यावेळेस बाबा घरी नसून बाहेर होते. घटनेच्या दिवशी मी पुण्यात होते. माझी परिक्षा तर, बाबा लग्नासाठी मुक्ताईनगरला गेले होते.
तेव्हा गावातील लोकांनी त्याला रूग्णालयात नेलं. अॅम्बुलन्समधून नेत असताना बाबांनी निखिलला पाहिलं. जेव्हा ही घटना घडली, तेव्हा बाबा घरातच नव्हते. नंतर बाबा घरी पोहोचले आणि त्यांना माहिती मिळाली. या गोष्टी लपवण्यासारख्या नाहीत. सर्व गावाला माहित आहे, अशी माहिती रोहिणी खडसे यांनी दिली.
निखिल यांच्या ऑपरेशनबाबत रोहिणी खडसे यांनी माहिती दिली. 'निखिलला पाठीचा त्रास होता. मणक्याची नस दबली गेली होती. त्यावेळी काही कारणास्तव ऑपरेशन करणं शक्य झालं नव्हतं. त्याची सहनशक्ती संपली होती. पेन किलर घेतल्यानंतर त्याला बरं वाटायचं पण नंतर परिस्थिती तीच..त्यानं हा निर्णय का घेतला, हे अद्याप मी समजू शकले नाही', असं रोहिणी खडसे म्हणाल्या.
कदाचित मी त्यावेळी गेले असते तर...
'त्याच्याशी शेवटचं बोलणं माझं ३० एप्रिल रोजी झालं. तो म्हणाला होता. 'तू मुक्ताईनगरला ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे.' पण माझी परीक्षा असल्याने मी जाऊ शकले नाही. आज वाटतं, कदाचित मी गेले असते, तर काही वेगळं झालं असतं', असंही रोहिणी खडसे म्हणाल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.