लाटीपाडा धरणातून सोडले पाणी; अठरा गावांची भागली तहाण

लाटीपाडा धरणातून सोडले पाणी; अठरा गावांची भागली तहाण
Dhule News
Dhule NewsSaam tv
Published On

धुळे : साक्री तालुक्यातील लाटीपाडा धरणामधून उजव्या कालव्यातून 10 mcft व नदीपात्रात 56 mcft पाणी सोडण्यात आले. यामुळे आजूबाजूच्‍या अठरा गावांचा पाणी (Dhule News) प्रश्‍न सुटला आहे. (dhule news Water released from latipada dam Thirst of eighteen villages)

गेल्या कित्येक दिवसांपासून या सर्व गावांमधील ग्रामस्थांतर्फे धरणातून पाणी सोडण्यात यावे; अशी मागणी वारंवार करण्यात येत होती. या गावांमध्ये पाण्याचा तुटवडा लक्षात घेता आमदार मंजुळा गावित (Manjula Gavit) यांच्या प्रयत्नातून लाटीपाडा धरणामधून पाणी सोडण्यात आले आहे. लाटीपाडा धरणातून आमदार मंजुळा गावित यांच्या उपस्थित पाणी सोडण्यात आले आहे. मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात पाण्याची टंचाई भासू लागल्याने जवळपास अठरा गावांना या पाण्याचा उपयोग होणार असून या अठरा गावांची तहान भागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com