
मनोज जैस्वाल, वाशिम प्रतिनिधी
Maharashtra Politics, Congress Slams Mahayuti : निवडणुकीत पैसा फेक तमाशा देख, असा खेळ महायुती सरकारने सुरू केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. ते वाशिममध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली. लाडकी बहीण योजनासह महायुतीच्या राजकारणवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भ्रष्टाचारासाठी बसलेले हे अवकाळी सरकार असल्याची टीकाही यावेळी सपकाळ यांनी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना सरसकट लाभ देणं सरकारची चूक असल्याची कबुली दिल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पवारांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला. निवडणुकीत पैसा फेक तमाशा देख असा खेळ महायुती सरकारनं केला, महिला सबलीकरणाची यांची कधीच भावना नव्हती. यांना जनतेच्या प्रश्नाचं देणंघेणं नाही. केवळ भ्रष्टाचारासाठी बसलेलं हे अवकाळी सरकार आहे, अशी जोरदार टीका सपकाळ यांनी केली. ते वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी इथ दर्शनासाठी आले होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना हे वक्तव्य केलं.
गांधी घराण्याबद्दल बोलण्याची लायकी नितेश राणेंची नाही.
ज्यांच्या वडिलांनी, आजींनी देशासाठी बलिदान दिलं, अशा राहुल गांधी यांच्याबद्दल बोलण्याची लायकी नितेश राणेंची नाही. अश्या शब्दात मंत्री नितेश राणेंचा चांगलाच समाचार सपकाळ यांनी घेतला. मूळ मुद्यापासून भरकटवण्यासाठी सरकणारे काही लोकांना सोडून दिलं आहे. बेताल, चेतावणीखोर वक्तव्य करणे, गटारगंगा ज्याच्या तोंडात आहे, अशा राणेंना सरकारने सोडून दिले आहे. यांच्याकडे शेतकऱ्यांसाठी, लाडकी बहिणींसाठी बोलण्यासाठी काहीच नाही, असा घणाघाती आरोप सपकाळ यांनी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.