Buldhana : ग्रामपंचायतीच्या आरओ फिल्टर एटीएमचे पाणी अशुद्ध; किनगावराजा गावात आजाराची साथ, जिल्हा आरोग्य प्रयोग शाळेचा अहवाल

Buldhana News : मागील काही दिवसांमध्ये गॅस्ट्रोची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता प्राथमिक आरोग्य केंद्राकडून विविध पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. यावेळी ग्रामपंचायत आरओ फिल्टरच्या तसेच बोरवेलच्या पाण्याच्या सुद्धा समावेश होता
Buldhana News
Buldhana NewsSaam tv
Published On

बुलढाणा : सिंदखेडराजा तालुक्यातील किनगांवराजा ग्रामपंचायत कडून लावण्यात आलेल्या शुद्ध पाण्यासाठीच्या आरओ फिल्टर एटीएमचे पाणी अशुद्ध झाले आहे. हे पाणी ग्रामस्थांसाठी पिण्यास अयोग्य असल्याचा निष्कर्ष जिल्हा आरोग्य प्रयोग शाळेने दिला आहे. तर अद्यापही या मशीनचे पाणी ग्रामस्थ पिण्यासाठी वापरत असल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भिती निर्माण झाली आहे. 

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील किनगांवराजा गांवामध्ये गावकर्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळाले, यासाठी ग्रामपंचायतीने आरओ सिस्टीम लावण्यात आली आहे. दरम्यान मागील काही दिवसांमध्ये गॅस्ट्रोची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता प्राथमिक आरोग्य केंद्राकडून विविध पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. यावेळी ग्रामपंचायत आरओ फिल्टरच्या तसेच बोरवेलच्या पाण्याच्या सुद्धा समावेश होता. दरम्यान आरओ एटीएमचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा निष्कर्ष प्रयोग शाळेकडून देण्यात आला आहे. 

Buldhana News
Heavy Rain : गरिबीचा संसार, मोलमजुरी करून गाडा हाकतोय, पावसानं माती केली; पावसामुळे सडलेला कांदा पाहून शेतकरी महिलेचे अश्रू अनावर

आरओ एटीएमचे पाणी पिण्यास अयोग्य 

आरओ एटीएमच्या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. अनेक नागरीकांना मळमळ, उलट्या होणे, पोट दुखणे यासह इतरही त्रास सुरू झाला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्ण वाढत असल्यामुळे नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यांनतर गॅस्ट्रोची लागण झाली असल्यांची वैद्यकीय तपासातून पासातून निष्पन्न झाले. आरोग्य विभागाने आरओ फिल्डर एटीएमला पाणीपुरवठा करणाऱ्या बोरवेच्या पाण्याचे नमुने घेतले होते. १४ मे रोजी त्याचा अहवाल आला. त्यामध्ये पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले होते. 

Buldhana News
Jalna Crime : जालन्यात भरदिवसात घरफोडी; सराईत गुन्हेगार २४ तासात ताब्यात, पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

ग्रामपंचायतकडून अद्याप ठोस उपाययोजना नाही 

दरम्यान खबरदारी म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाला आरोग्य विभागांने यासंदर्भात पत्र देत अवगत करुन उपाययोजना करण्यास सांगितले होते. उपाय योजना व खबरदारी म्हणून अद्याप ग्रामपंचायतीने कुठलेही ठोस पाऊल उचलले बसून ग्रामस्थ तेच पाणी पित आहे. पुढे एखादी मोठी घटना घडल्यास ग्रामपंचायत जबाबदार राहील; असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तर ग्रामपंचायत प्रशासनाकडून तात्काळ उपाय योजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com