

भरत मोहोळकर, साम टीव्ही प्रतिनिधी
बिहारमध्ये काँग्रेसचा पराभव झाला आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीला हादरे बसायला सुरुवात झाली... आता महाराष्ट्रातला महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय... तो नेमका कसा? आणि बिहारच्या निवडणुकांमुळे महाराष्ट्राला कसे हादरे बसले आहेत? याबाबत माहिती जाणून घ्या.
बिहारच्या पराभवाचे हादरे महाराष्ट्रापर्यंत
बिहारचा निकाल लागला आणि विरोधकांच्या दारूण पराभवाचे पडसाद थेट महाराष्ट्राच्या राजकारणात उमटले. महाविकास आघाडीतील दोन मित्र पक्षांनीच एकमेकांकडे बोट दाखवले आहे.काँग्रेस जागावाटपात मोठा वाटा मागत असल्यानेच पराभव होतो, असा टोला अंबादास दानवेंनी कॉंग्रेसला लगावलाय...तर काँग्रेसने बिहारच्या निवडणुकीकडे महाराष्ट्राच्या चष्म्यातून पाहू नका, अशा सल्ला मित्रपक्षांना दिलाय...
दुसरीकडे राज्यातील महायुतीच्या विजयाप्रमाणेच बिहारचा निकाल लागला असल्यानं भाजपनं आनंद व्यक्त केलाय... एकीकडे काँग्रेसनं मनसेसोबतच्या युतीला स्पष्ट नकार दिलेला असतानाच आयती संधी साधून सत्ताधाऱ्यांनी थेट ठाकरे बंधूंना टार्गेट केलयं......
लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुकीत जागावाटपावरून महाविकास आघाडीत मतभेद असल्याचं अनेकदा उघ़ड झालयं... आता बिहारच्या निकालाचे प़डसाद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर पडणार हे निश्चित.. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांसह, महापालिकेचे मैदान मारण्यासाठी विरोधक एकीचं बळ राखतात की स्वबळाचा नारा देऊन जनमताची चाचपणी करतात हे पाहणं महत्वाचं आहे..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.