मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. मराठवाड्यातील बीडमध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करत आहेत. गेल्या ८ महिन्यात १८६ शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. (Latest Marathi News)
विविध कारणांनी आठ महिन्यांत ४४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. बीड जिल्ह्यात गेल्या ८ महिन्यांत तब्बल ४४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं शासकिय आकडेवारीमधून समोर आलं आहे.
यामध्ये १८६ शेतकरी आत्महत्या आहेत. एकूण आत्महत्यांच्या तुलनेत शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण ४२ टक्के इतके आहे. मराठवाड्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत.
शेतकरी आत्महत्येची कारणे
शेतकरी आत्महत्येची विविध कारणे समोर आली आहेत. यामध्ये सततची नापिकी, आर्थिक उत्पन्न कमी असल्याने खासगी सावकार कर्ज, मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न, वृद्ध आई-वडिलांचे आजारपण, यामुळे नैराश्यातून शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याचं समजलं आहे.
बदलत्या जीवनशैलीने ताणतणाव, संयमाचा अभाव, जबाबदाऱ्यांचे ओझे आणि कर्जाचा डोंगर अशा विविध कारणांमुळे गेल्या ८ महिन्यांत ४४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केलीये. आत्महत्येच्या आकडेवारीत ३६१ पुरुष, ४५ महिला आणि ११ मुलींचा तसेच २३ मुलांचा समावेश आहे.
आत्महत्येचं वाढतं प्रमाण पाहता आरोग्य विभागाच्या वतीने संयम राखा, मानसिक स्व:स्ताची काळजी घ्या, असं आवाहन करण्यात येत आहे. यासोबतच तणावग्रस्त असलेल्या व्यक्तींना मोफत उपचार दिला जातोय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.