रत्नागिरी : बेकायदेशीर इंटरनॅशनल कॉल केल्याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तपासातून समोर आले आहे कि, या दोन व्यक्ती इंटरनॅशनल कॉल सेंटर चालवत आहेत. याप्रकरणी रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार मधील मोबाईल शाँपीच्या मालकासह पनवेलमधील एकाला पोलीसांनी अटक केली आहे.
हे देखील पहा -
मुंबई एटीसनं दिलेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, देशविरोधी कारवायांसाठी हे इंटरनॅशनल कॉलिंग सेंटर सुरू होते का? तसेच कॉल सेंटर चालवण्यामागचा उद्देश काय होता? याबाबत सध्या तपास सुरु असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे.
यावेळी पोलिसांनी सर्वर, लॅपटॉपसह काही साहित्य देखील जप्त केले आहे. सर्व्हर रत्नागिरीत आणि कॉलिंग सेंटर मुंबईतील वांद्रेमधील एका इमारतीत सुरू होते. अशी धक्कादायक माहीती देखील समोर येतेय. वाईपद्वारे हे इंटरनँशनल काँल सुरु होते आणि दहशतवादी कारवायासाठी नेहमी ही पद्धत वापरली जाते असं तज्ञांचं मत आहे. त्यामुळे पुढील तपासातून काय समोर येईल हे महत्वाचं ठरणार आहे.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.