मराठा आंदोलकांच्या मागणीनंतर राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला.. मात्र याचं निर्णयामुळे सरकारपुढे नवा पेच उभा राहिलाय. मराठा समाजानंतर आता बंजारा समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालाय...हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात तातडीने समावेश करा, अन्यथा रस्त्यावरची लढाई लढू असा थेट इशाराच बंजारा समाजानं सरकारला दिलाय.
दरम्यान हैदराबाद गॅझेटबाबत मुंबईत बंजारा समाजाचे मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत तर बीडमध्ये बंजारा समाजाच्या नेत्यांच्या उपस्थितीत बंजारा समाजाची बैठक झाली. .या बैठकीत 15 सप्टेंबरला बीडमध्ये विराट मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय..
दुसरीकडे गेवराई मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनीही बंजारा समाजाच्या मागणीला पाठिंबा दर्शवलाय.
राज्यात बंजारा समाज जवळपास 8 टक्कयांपर्यंत आहे
राज्यात बंजारा समाज हा ओबीसी प्रवर्गातील भटक्या विमुक्त जाती आणि जमातीमध्ये येतो. आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हैदराबाद गॅझेटनुसार राज्यातील बंजारा समाजाही आदिवासी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी करतोय. मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात मोठ्या प्रमाणात बंजारा समाजाची लोकसंख्या आढळते.
आदिवासी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी आता बंजारा समाज आक्रमक झालेला असला तरी याआधी धनगर समाजानंही आदिवासी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी केली होती. त्यामुळे हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर राज्य सरकारसमोर मोठ आव्हानं उभं राहणार आहे.. या समाजाला आदिवासी समाजातून आरक्षण मिळणार का? आदिवासी प्रवर्गातील इतर जाती- जमातींची त्यावर काय भूमिका असेल? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.