मयुरेश कडव
बदलापूर : बदलापुरातल्या नवीन वडवलीत अवैध ब्लास्टिंगमुळे येथील नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. ब्लास्टिंगमुळे नवीन वडवली, नवीन अंबरनाथ तसेच साई गावातील अनेक घरांना तडे गेले आहेत. यामुळे या गावांमधील रहिवाशांचा जीव धोक्यात आला आहे. हे ब्लास्टिंग तत्काळ न थांबवल्यास कचरा प्रकल्पाचे काम बंद पाडू असा इशारा या रहिवाशांनी दिला आहे.
बदलापूर नगरपालिका हद्दीतील नवीन वडवली परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून कचरा प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगर मधील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. मात्र या कचरा प्रकल्पाच्या नावाखाली येथील डोंगर फोडण्यात येत असून त्यासाठी दिवस- रात्र ब्लास्टिंगचे काम करण्यात येत आहे. याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे.
परिसरातील नागरिकांना ब्लास्टिंगचा त्रास
जवळपास सहा इंच बोअरवेल मारून हे ब्लास्टिंग करण्यात येत आहे. त्याचा नाहक त्रास नवीन वडवली, नवीन अंबरनाथ तसेच साई गावातल्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. तसेच ब्लास्टिंगमुळे अनेक घरांना तडे गेले, असून लहान मुलं रात्री दचकून जागी होतात. तसंच विद्यार्थ्यांना अभ्यास करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. घरात धूळ येत असल्याने अनेकांना श्वसनाचे आजार देखील झाले आहेत; असा या नागरिकांचा आरोप आहे.
प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा
डोंगरात ब्लास्टिंग होत असल्याने तिन्ही गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाल्याने परिसरातील रहिवासी आक्रमक झाले आहेत. यामुळे ब्लास्टिंग तत्काळ थांबविण्याची मागणी होत असून हे ब्लास्टिंग न थांबवल्यास कचरा प्रकल्पाचे काम पूर्णपणे बंद पाडू असा इशारा रहिवाशांनी दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.