अंबरनाथ : अंबरनाथमधील चिखलोली परिसरात एमआयडीसीच्या हलगर्जीपणामुळे आणखी एका इसमाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एमआयडीसीच्या बंद पडलेल्या एअरवॉलमुळे आणखी एका निष्पापाचा बळी गेला आहे. या परिसरात दुचाकीला भरधाव ट्रकने मागून धडक दिल्याने अपघात झाला असून पित्याचा मृत्यू झाला, तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
अंबरनाथ (Ambarnath) परिसरातील ऑरचिड स्वेकर सोसायटीत राहणारे पारसनंद पाल हे सकाळच्या सुमारास उल्हासनगरला जात असताना जांभूळ फाटा रोडवर ही दुर्दैवी घटना घडली. पारसनंद पाल आपल्या मुलासोबत दुचाकीवरून जात असताना मागून येणाऱ्या एका भरधाव विटाने भरलेल्या ट्रकने धडक दिल्यामुळे हा (Accident) अपघात घडला. यामध्ये पारसनंद पाल यांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्यांचा मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला. तर पारसनंद यांचा मुलगा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
पालिका, एमआयडीसीच्या हलगर्जीपणामुळे बळी
दरम्यान असे अपघात या रोडवर नेहमीच होत असून याला पालिका प्रशासन आणि एमआयडीसीचा हलगर्जीपणा असल्याचा स्थानिकांचा रोष आहे. जांभूळ फाटा रोडवर एमआयडीसीचा बंद पडलेल्या पाइप लाइनच्या एअरवॉलमुळे अनेकदा या परिसरात अपघात होत आहेत. स्थानिक नागरिकांनी अनेकदा यासंदर्भात तक्रारी केल्यानंतर ही केवळ प्रशासनाच्या हलगर्जीपणा आणि दुर्लक्ष केल्यानेच असे अपघात घडत असून यामध्ये निष्पाप नागरिकांचा नाहक बळी जातं असल्याचे आरोप स्थानिकांनी केला आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.