Ajit Pawar On Baramati
Ajit Pawar On Baramati Saam Digital

Ajit Pawar On Baramati : अरे बापरे! बारामती म्हणायचीही भीती वाटू लागलीये; अजित पवार असं का म्हणाले?

Maharashtra Politics : पुण्यातील कसबा येथील मानाच्या गणपतीचं आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी बारामतीचं नावही घ्यायला मला आता भीती वाटायला लागली, असं मिश्किल उत्तर दिलं आहे.
Published on

लोकसभा निवडणुकीत बारामतीत पराभव झाल्यानंतर अजित पवार यांनी बारामतीतून विधानसभा निवडणूक न लढण्याचे संकेत दिले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही त्यांना पराभव समोर दिसत असल्याचं म्हटलं होतं. पत्रकारांनी आज त्यावर विचारलेल्या प्रश्नावर आज अजित पवारांनी, अरे बाप रे! मला आता बारामती सुद्धा म्हणायची पण भीती वाटायला लागली, असं मिश्किल उत्तर दिलं आहे. पुण्यातील कसबा येथील मानाच्या गणपतीचं आज त्यांनी दर्शन घेतलं, यावेळी ते बोलत होते.

बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र सुप्रीया सुळे यांचा या निवडणुकीत मोठा विजय झाला. अजित पवार यांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली होती. चार पैकी एक जागा निवडून आली होती. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांची ही पहिलीच निवडणूक होती. या पराभवानंतर अजित पवार गटाकडून चिंतन सुरू असताना अजित पवार यांनी बारामतीकरांना आता दुसऱ्या आमदाराची गरज आहे, असं विधान करत बारामतीत न लढण्याचे संकेत दिले आहेत.

संजय राऊत यांनी त्यांच्या या विधानवर प्रतिक्रिया देताना, अजित पवार यांचा लोकसभेत पराभव झाला आता विधानसभेतही पराभव होणार आहे. आणि त्यांचा हा पराभव निश्चित आहे. त्यांनी राष्ट्रवादी पक्ष फोडला. पित्यासमान असलेल्या शरद पवार यांनी त्यांना सर्व काही दिलं. मात्र त्यांच्या पाटीत खंजीर खुपसल्याचा आरोप त्यांनी केला होता. आता त्याची फळ त्यांना भोगावी लागणार असंही त्यांनी म्हटलं होतं.

Ajit Pawar On Baramati
53km Elevated Road : पुण्यात तयार होतोय ५३ किमीचा फ्लायओव्हर, थेट समृद्धी महामार्गाला जोडणार, मुंबई-पुणेकर नागपूरला झटक्यात पोहचणार!

अमित शहा आणि आमच्या बद्दलच्या चर्चा खोट्या

अमित शहा आणि आमच्या बद्दलच्या चर्चा झाल्या त्या खोट्या आहेत. मला त्यांना रात्री भेटता आले नाही. आम्हाला दुसऱ्या दिवशी वेळ दिला होता. त्यावेळी आम्ही राजकीय चर्चा केली. इतर शेती विषयक चर्चा सुद्धा आम्ही केली.राज्यातील अनेक ठिकाणी खूप पाऊस झाला त्यात अनेक भागात नुकसान झालं. मात्र जवळपास सर्व धरणं १०० टक्के भरली आहेत. जायकवाडी कधी भरत नाही पण यंदा सगळे समाधानी आहेत या सुद्धा चर्चा झाल्याचं अजित पवारांनी सांगितलं.

बारामतीचा गब्बर कोण असे फ्लेक्स लागले होते, त्यावर अजित पवार म्हणाले, चालायचं!! इतक्या लहान गोष्टीमध्ये लक्ष द्यायची गरज नाही.आमची महायुती आहे, खालच्या प्रत्येक लोकांकडे लक्ष देता येत नाही.या लोकांना तुम्ही प्रसिध्दी देता कारण नसताना युतीमध्ये अंतर आहे का असा प्रयत्न केला जातो, असं म्हणत त्यांनी माध्यमांनाही जबाबदार धरलं.

Ajit Pawar On Baramati
Special Story: स्वातंत्र्यानंतरही रुग्णांच्या वाट्याला 'डोली'; काळ बदलला सरकारं बदलली तरीही व्यवस्थेचे तीन तेरा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com