Ahmednagar Politics: ...म्हणून थोरातांच्या पायाखालची वाळू सरकली, राधाकृष्ण विखे-पाटील यांचा निशाणा

Radha Krishna Vikhe Patil Criticized Balasaheb Thorat: जयश्री थोरात आणि बाळासाहेब थोरात यांच्या टीकेला आता राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Ahmednagar Politics: ...म्हणून थोरातांच्या पायाखालची वाळू सरकली, राधाकृष्ण विखे-पाटील यांचा निशाणा
Radha Krishna Vikhe Patil Criticized Balasaheb ThoratSaam Tv
Published On

सचिन बनसोडे, शिर्डी

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत भाजपचे नेते वसंत देशमुख यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अहमदनगरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यानंतर जिल्ह्यामध्या जाळपोळ, तोडफोड आणि आंदोलनं देखील झाली. सध्या याच घटनेवरून थोरात आणि विखे-पाटील कुटुंबीयांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. जयश्री थोरात आणि बाळासाहेब थोरात यांच्या टीकेला आता राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'संगमनेर तालुका तुमच्या बापाची इस्टेट नाही. तालुक्याचे मालक होण्याचा प्रयत्न करू नका.' अशा शब्दात राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरातांवर निशाणा साधला.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, 'सुजय विखेंच्या सभेत जे वक्तव्य झालं त्याबद्दल आम्ही स्पष्टीकरण दिलंय. वसंतराव देशमुखांनी जे अपशब्द वापरले त्याचा आम्ही निषेध केलाय. माझ्या आणि सुजयच्या सार्वजनिक जीवनात आम्ही कधीही अशी वक्तव्य केली नाही. देशमुख यांना अटक करावी हीच मागणी आम्ही केली होती. मात्र वसंत देशमुख हे भाजपचे नाही तर काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई करावी. '

तसंच,'देशमुख बोलले यामागे राजकीय षडयंत्राचा भाग वाटतोय. अर्ध्यातासांत थोरातांचे गुंड गोळा झाले. थोरातांचा पीए, त्यांचे भाऊ इंद्रजीत थोरात यांच्या गाडीत काठ्या-कुऱ्हाडी होत्या. त्यांना सुजयवरच प्राणघातक हल्ला करायचा होता. संगमनेर तालुक्यात सुजयची लोकप्रियता वाढली. त्यांच्या बालेकिल्ल्यात सुजयच्या उच्चांकी सभा होताय. म्हणून थोरातांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. इतक्या वर्षे त्यांनी दहशत माजवून निवडणुका जिंकल्या. एकीकडे स्वतःला सुसंस्कृत म्हणता आणि दुसरीकडे राजकीय दहशतवाद सुरू ठेवता. गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ सुनियोजित होती. महिला आणि कार्यकर्त्यांना मारहाण झाली. याची चौकशी व्हायलाच पाहिजे. याचा मास्टरमाईंड कोण याचा शोध घ्यावा लागेल.', असे विखे-पाटील यांनी सांगितले.

Ahmednagar Politics: ...म्हणून थोरातांच्या पायाखालची वाळू सरकली, राधाकृष्ण विखे-पाटील यांचा निशाणा
Maharashtra Politics: अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? आशिष शेलार यांनी केलं मोठं वक्तव्य; VIDEO

वसंत देशमुखांच्या वक्तव्याबद्दल बोलताना विखे-पाटील यांनी सांगितले की, 'आम्ही देशमुखांच्या वक्तव्याने समर्थन केलेच नाही वसंतराव देशमुख यांना अटक झाली. त्याला आम्ही लपवला हा आरोप चुकीचा. तुमच्या लोकांनी गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ केली. विखेंना गावबंदी आणि तालुका बंदी करण्याची भाषा करतायत. तुमच्या बापाची इस्टेट आहे का? तालुक्याचे मालक होण्याचा प्रयत्न करू नका. जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.'

जयश्री थोरात यांच्याबद्दल बोलताना विखे-पाटील यांनी सांगितले की, 'जयश्री ताईबद्दल आम्ही काहीच बोललो नाही. त्या स्वतःला या प्रकरणात का ओढाऊन घेताय? तुम्ही या भानगडीत येऊ नका. तुमच्या पिताश्रींचा दहशतवाद समोर आलाय. वसंत देशमुख कार्यक्रमाचे अध्यक्ष होते म्हणजे ते आमचे होत नाहीत. जयश्रीताई फार छोट्या आहेत. त्यांना अजून फार शिकायचं आहे. सुजयवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न होता. त्याची माफी कोण मागणार?', असा सवाल विखे-पाटील यांनी केला आहे.

Ahmednagar Politics: ...म्हणून थोरातांच्या पायाखालची वाळू सरकली, राधाकृष्ण विखे-पाटील यांचा निशाणा
Maharashtra Politics: मी पहाटे उठून कुठे जात नाही, हर्षवर्धन पाटलांची अजित पवारांवर बोचरी टीका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com