Ahilyanagar Corporation : अहिल्यानगर मनपा निवडणूक प्रक्रिया रेंगाळणार; अंतिम प्रभाग रचना जाहीर न झाल्याने प्रक्रिया न्यायालयात जाण्याची शक्यता

Ahilyanagar news : मुदत संपूनही प्रभाग रचना जाहीर न केल्यामुळे विरोधी पक्ष असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे
Ahilyanagar Corporation
Ahilyanagar CorporationSaam tv
Published On

सुशील थोरात 
अहिल्यानगर
: अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्याची प्रक्रिया रेंगाळली आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्याची तारीख ९ ते १३ ऑक्टोबरपर्यंत होती. मात्र १३ ऑक्टोबर संपून १४ ऑक्टोबर उजाडला तरी अंतिम प्रभाग रचना निवडणूक आयोगाने जाहीर करण्यात आलेली नाही. यामुळे सदरची निवडणूक प्रक्रिया न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

अहिल्यानगर महानगर पालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्ष सज्ज झाले आहेत. इच्छुक उमेदवार देखील तयारीत आहे. महापालिकेची प्रभाग रचना १३ नोव्हेंबरला जाहीर होणे अपेक्षित असताना अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. यामुळे निवडणूक आयोगाची भूमिका नेमकी काय आहे? हे कोणालाच समजू शकत नसून निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचना का जाहीर केली नाही. याबाबत अद्याप कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक नगरसेवक आणि मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Ahilyanagar Corporation
Gadchiroli : १० कोटीचे बक्षीस असलेल्या नक्षलवादीचे आत्मसमर्पण; वरिष्ठ नेता भूपती ६० सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर शरण

ठाकरे गटाचा इशारा 

दरम्यान मुदत संपूनही प्रभाग रचना जाहीर न केल्यामुळे विरोधी पक्ष असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आता निवडणूक आयोगाने पूर्वी जी प्रभाग रचना होती, ती आहे तशीच ठेवावी. जर निवडणूक आयोगाने दिलेली मुदत संपून देखील नवीन प्रभाग रचना जाहीर केली नाही तर आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठवू; असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी दिला आहे.

Ahilyanagar Corporation
Washim : अट्टल मोटरसायकल चोरटा ताब्यात; ९ मोटरसायकल जप्त, रिसोड पोलिसांची कारवाई

प्रशासन दबावाखाली काम करतेय : काँग्रेस 
अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्याची तारीख उलटूनही प्रभाग रचना जाहीर होत नसल्यामुळे प्रशासकीय अधिकारी आणि प्रशासन कोणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश सचिव सुनील क्षेत्रे यांनी केला आहे. महानगरपालिकेची अवस्था अत्यंत दयानिय करण्यात झाली असून नगरसेवक नसल्याने सर्व कारभार प्रशासकीय विभाग पहात आहे. यामुळे शहरात विविध नागरी समस्या उद्भवल्या असून लवकरात लवकर निवडणूक व्हावी; अशी नागरिकांची इच्छा आहे. मात्र निवडणूक आयोग आणि राज्य सरकार मिळून निवडणूक होऊ नये म्हणून प्रयत्न करत असल्याचा आरोप युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com