
लाखो वारकरी जात-धर्म, पंथ, प्रांत विसरुन पंढरीच्या दिशेने निघालेत... मात्र वारी आणि नमाजची तुलना करत समाजवादी पक्षाचे आमदार आबू आझमींनी वादग्रस्त वक्तव्य केलंय... आझमींनी वारकऱ्यांच्या अस्मितेला ठेच पोहचवल्याचं सांगत वारकरीही आक्रमक झालेत...
तर दुसरीकडे आबू आझमींच्या वक्तव्याची गंभीर दखल अल्पसंख्याक आयोगाने घेतलीय...तर मुख्यमंत्री फडणवीसांनी मात्र आबू आझमींच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाष्य करणं टाळलंय... मतांच्या राजकारणासाठी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं सांगत आझमींनी स्पष्टीकरण दिलंय...
संत परंपरा ही सर्वधर्मांना सोबत घेऊन समतेचा संदेश देणारी आहे.. मात्र याच वारीबाबत वादग्रस्त वक्तव्य करुन धार्मिक तिढा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे.. त्यामुळे आबू आझमींसारख्या वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना संत तुकाराम महाराजांच्या भाषेत, भले देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी.... असंच उत्तर द्यावं लागेल....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.