Narali Punima 2023 : नारळी पौर्णिमेला का करतात सत्य नारायणाची पूजा, काय आहे यामागची आख्यायिका? जाणून घ्या

Satyanarayana Puja : आज आहे श्रावण पौर्णिमा म्हणजेस 30 ऑगस्ट. या श्रावण पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असेही म्हणतात.
Narali Punima 2023
Narali Punima 2023Saam Tv
Published On

Why Is Satyanarayana Puja Performed On Narali Punima : आज आहे श्रावण पौर्णिमा म्हणजेस 30 ऑगस्ट. या श्रावण पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी भारतात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. या दिवशी अनेक लोक उपवास करतात आणि सत्यनारायणाची पूजाही करतात.

भगवान सत्यनारायणाची कथा (Story) वाचणे हे देखील आजच्या दिवशी खूप शुभ मानले जाते. या पौर्णिमेला समुद्र स्नानाचेही विशेष महत्त्व मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया नारळी पौर्णिमेची व्रत कथा काय आहे.

Narali Punima 2023
Narali Purnima 2023 : श्रावणी पौर्णिमेला करतात समुद्रासह या देवतांची पूजा, धार्मिक कारण आहे खास

पौराणिक कथेनुसार, एका नगरात तुंगध्वज नावाचा राजा राहत होता. त्याला जंगलात शिकार करण्याची खूप आवड होती. एके दिवशी राजा जंगलात शिकारीला गेला असताना त्याला थकवा लागतो. थकवा दूर करण्यासाठी तो एका वटवृक्षाखाली विश्रांती घेण्यासाठी थांबला.

त्या राजाने तेथे पाहिले की त्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक (People) जमले आहेत आणि ते भगवान सत्यनारायणाची पूजा करतायत. तो राजा तेथे ते लोक काय करतायत हे पाण्यास गेला आणि राजाला स्वतःचा एवढा अहंकार होता की त्यावेळी त्याने देवाला नमस्कारही केला नाही, तो तेथे फक्त कथा ऐकायला गेला नाही आणि प्रसादही घेतला नाही.

Narali Punima 2023
Narali Pornima Special Recipe: नारळी पौर्णिमेला बनवा नारळापासून चमचमीत स्वादिष्ट पदार्थ, पाहा रेसिपी

आपल्या राज्यात आल्यावर राजाने पाहिले की त्याच्या राज्यावर कोणीतरी हल्ला केला आहे. आपल्या राज्याची अशी अवस्था पाहून राजाला लगेच समजले की हे सत्यनारायणाच्या प्रसादाचा अनादर केल्यामुळे झाले आहे. आपली चूक सुधारण्यासाठी राजा पुन्हा त्याच जंगलात धावत गेला जिथे ते लोक भगवान सत्यनारायणाची कथा सांगत होते. तिथे पोहोचल्यावर राजाने प्रसाद स्वीकारला आणि आपल्या चुकीबद्दल माफी मागितली.

यानंतर राजाला भगवान सत्यनारायण यांनी माफ केले आणि त्यांच्या राज्य पूर्वीसारखे केले. देवाच्या कृपेने, राजाने दीर्घकाळ राज्य केले आणि शेवटी स्वर्गवासी झाला. त्यामुळे या अख्यायिकेनुसार जो व्यक्ती श्रावण पौर्णिमेच्या (Purnima) दिवशी सत्यनारयणाची कथा वाचतो किंवा ऐकतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. ही कथा वाजपेयी यज्ज्ञाचे फळ देणार असल्याचे बोलले जाते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com