प्रत्येकजण स्वत:च्या कामात इतका गुरफटून गेलाय की, त्याला स्वत:कडे लक्ष देता येत नाही. आयुष्यात काम, नातेसंबंध आणि जबाबदाऱ्यांखाली दबून राहिल्यामुळे आपल्याला स्वत:बदल विचार करायला मिळत नाही.
असे अनेक लोक आहे ज्यांना स्वत:साठी एक दिवसही वेळ नसतो. अशावेळी हळूहळू शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या व्यक्ती आजारी पडू लागते. आज आम्ही तुम्हाला काही लक्षणांबद्दल सांगणार आहोत, ज्यासाठी तुम्हाला कामातून आणि जबाबदारीतून काही काळ विश्रांती घेणे गरजेचे आहे.
1. फोकस करण्यात अडचण
कामावर लक्ष केंद्रित करण्यास आणि मन एकाग्र करण्यात अडचण येत असेल तर तुम्ही काही काळ विश्रांती घेणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमचे मन शांत राहिल. तसेच स्वत: कडे लक्ष केंद्रित करता येईल.
2. शरीरात ऊर्जेची कमतरता
आपल्याला अस्वस्थ वाटू लागले की, चहा किंवा कॉफीचा पर्याय आपण निवडतो. परंतु, दिवसभरातील कामे करताना सतत आळसपणा येतो. त्यावेळी तुम्ही शारीरिक नाही तर भावनिक आणि मानसिकदृष्ट्या थकलेले आहात. तसेच दररोज नवीन आव्हाने घेण्याची तुमची ही सवय तुम्हाला आतून थकवत असते. त्यासाठी काही वेळेसाठी कामातून ब्रेक घेणे गरजेचे आहे.
4. भावनिक होणे
भावनिकदृष्ट्या व्यक्ती थकलेली असेल तर ती, स्वत:च्या भावनांना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करु शकत नाही. अगदी छोटी गोष्ट देखील अस्वस्थ करु शकते. ज्यामुळे तुम्हाला लगेच रडू कोसळते. अशावेळी रडण्याऐवजी मित्रांशी बोला.
5. प्रेरणा
स्वप्न पूर्ण करताना आपण वेळेचे (Time) भान राखत नाही. परंतु, अशी वेळ येते की, जेव्हा काम करताना कोणतीही प्रेरणा मिळत नाही. त्यामुळे कामाची इच्छा होत नाही. जर तुमच्या काम करण्याची प्रेरणा नसेल तर तुम्हाला स्वत:ला पूर्वीसारखे करण्यासाठी वेळ देणे गरजेचे आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.