

पाळी उशिरा येण्याचं प्रमुख कारण ताणतणाव आणि हार्मोन असंतुलन आहे.
पपई, ओवा, तुळस आणि आले याचे सेवन केल्याने मासिक पाळी वेळेत येते.
गरम पाण्याचा शेक आणि हलका व्यायाम रक्तप्रवाह सुधारतो.
व्हिटॅमिन Cयुक्त आहार हार्मोन संतुलन राखण्यात मदत करतो.
महिलांचा मासिक पाळीचा चक्र साधारणपणे २८ ते ३५ दिवसांच्या दरम्यान चालू असते. पण अनेक वेळा ताणतणाव, हार्मोन्समधील असंतुलन, वजनातील बदल किंवा आहारातील गडबड यामुळे पिरियड्स उशिरा येतात. काही वेळा महिलांना मासिक पाळी लवकर यावी असंही वाटते. जसं लांबच्या प्रवासाला जाण्यापूर्वी, सण किंवा खास प्रसंगापूर्वी. अशा वेळी औषधांचा वापर न करता काही नैसर्गिक उपाय मदत करू शकतात. हे उपाय शरीरातील रक्तप्रवाह सुधारतात, हार्मोन संतुलित करतात आणि मासिक पाळी वेळेत येण्यासाठी उपयुक्त ठरतात.
गरम पाण्याचा शेक घ्या
पाळी वेळेवर किंवा थोडी लवकर यावी यासाठी घरगुती उपाय सोपे आहेत. सर्वात पहिले म्हणजे गरम पाण्याची किंवा हीट थेरपीची मदत घ्या. पोटावर गरम पाण्याची पिशवी किंवा हीटिंग पॅड ठेवले असता रक्तसंचार वाढतो आणि गर्भाशयाच्या स्नायूंना आराम मिळतो. त्यामुळे पाळी सुरू होण्यास मदत होते.
पपईचे सेवन करा
पपईचे खाणं हा सुद्धा एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे. कच्च्या पपईत असे एन्झाइम्स असतात जे गर्भाशयाला उत्तेजित करतात आणि हार्मोनल संतुलन साधतात. दररोज दोन वेळा पपई खाल्ल्यास त्याचा परिणाम काही दिवसांत दिसतो.
ओव्याचा काढा
त्याचप्रमाणे ओवा आणि गुळाचा काढा हा पाळी लवकर आणण्यासाठी पारंपरिक घरगुती उपाय आहे. एक ग्लास पाण्यात एक चमचा ओवा आणि थोडासा गूळ घालून उकळा आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या. हा उपाय रक्तसंचार वाढवतो आणि गर्भाशयाचे कार्य सक्रिय करतो.
तुळशीचा चहा
आले आणि तुळशीची चहा देखील फायदेशीर ठरतो. आले रक्तप्रवाह सुधारते, तर तुळस हार्मोनल क्रिया संतुलित ठेवते. हे मिश्रण नैसर्गिकरीत्या मासिक पाळी नियमित करण्यात मदत करते.
फळांचे सेवन करा
शरीरातील विटामिन C चे प्रमाण वाढवणे देखील उपयोगी ठरते. संत्री, लिंबू, डाळिंब यांसारख्या फळांमध्ये भरपूर व्हिटॅमिन C असते. हे शरीरात इस्ट्रोजेनचे प्रमाण वाढवते, ज्यामुळे गर्भाशयाची अस्तर (uterine lining) लवकर तुटते आणि पाळी सुरू होण्यास मदत होते.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
पाळी उशिरा येण्याची मुख्य कारणं कोणती?
ताणतणाव, हार्मोन्समधील असंतुलन, वजनातील बदल, अपुरा आहार आणि झोपेचा अभाव ही काही मुख्य कारणं आहेत.
पाळी वेळेवर येण्यासाठी नैसर्गिक उपाय कोणते आहेत?
गरम पाण्याचा शेक, पपईचं सेवन, ओव्याचा काढा, तुळशीचा चहा आणि व्हिटॅमिन Cयुक्त आहार घेणे हे प्रभावी उपाय आहेत.
पपई खाल्ल्याने पाळी लवकर येते का?
कच्च्या पपईतील एन्झाइम्स गर्भाशयाला उत्तेजित करतात आणि हार्मोन्स संतुलित ठेवतात, त्यामुळे पाळी वेळेत येण्यास मदत होते.
औषधांशिवाय पाळी कशी नियमित करता येईल?
संतुलित आहार, पुरेशी झोप, व्यायाम आणि नैसर्गिक उपाय यांच्या मदतीने औषधांशिवाय पाळी नियमित करता येते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.