Shardiya Navratri 2023: शारदीय नवरात्रीत जवाचे धान्य का पेरले जाते? जाणून घ्या महत्त्व

Ghatasthapana Ghat Vidhi 2023 : घटस्थापनेला घट का बसवला जातो. यामध्ये धान्याची पेरणी का केली जाते?
Shardiya Navratri 2023
Shardiya Navratri 2023Saam Tv
Published On

Navratri Festival 2023 :

शारदीय नवरात्रौत्सव लवकरच सुरु होणार आहे. आश्विन महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला शारदीय नवरात्रौत्सव सुरु होतो. यंदा हा उत्सव १५ ऑक्टोबरपासून ते २४ ऑक्टोबरपर्यंत हा सण साजरा केला जाणार आहे.

नवरात्रीच्या या नऊ दिवसात दूर्गा देवीची (Durga Devi) विशेष पूजा केली जाते. देशभरात हे नऊ दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना असते. या दिवशी घरोघरी घट देखील बसवला जातो. परंतु, घटस्थापनेला घट का बसवला जातो. यामध्ये धान्याची पेरणी का केली जाते? जाणून घेऊया यामागचे कारण

घटस्थापना (Ghatasthapana) करताना सात प्रकारच्या धान्यांची पेरणी केली जाते. याला सप्तधान्य म्हणून ओळखले जाते.या सप्तधान्यात प्रामुख्याने जव, तीळ, धान, मूग, बाजरी, चणे, गहू यांचा समावेश असतो. शास्त्रानुसार धान्य हे ब्रम्हदेवाचे स्वरुप मानले जाते. असे म्हटले जाते की, जर धान्याचे अंकुर २ ते ३ दिवसात आले तर ते अतिशय शुभ मानले जाते.

तसेच नवरात्रीत (Navratri) विड्याच्या पानाला देखील अधिक महत्त्व आहे. कलशात विड्याचे पान आणि नारळ ठेवल्यानंतर घटस्थापनेला पूर्णत्व प्राप्त होते. असे म्हटले जाते की, सप्तधान्यात जवाला अधिक महत्त्व आहे. हिरवे जव समृद्धी, शांतता आणि प्रगतीचे प्रतीक मानले गेले आहे.

Shardiya Navratri 2023
Navratri Ghatasthapana Muhurat 2023: शारदीय नवरात्रौत्सव कधी आहे? जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत

1. जवाची पेरणी का केली जाते?

जव हे ब्रम्हदेवाचे प्रतीक मानले जाते. पौराणिक कथेनुसार ब्रह्माने विश्व निर्माण केले तेव्हा वनस्पतीमध्ये पहिले पीक हे 'जव' होते. त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या वेळी प्रथम जवाची पूजा केली जाते. जव हे विश्वाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. म्हणून जेव्हा जेव्हा देव-देवातांची पूजा केली जाते तेव्हा जव अर्पण केले जाते. अनेक धार्मिक कार्यात होम-हवनात जवाचा प्रामुख्याने वापर देखील केला जातो.

Shardiya Navratri 2023
Shardiya Navratri 2023 : नवरात्रीत ९ दिवस उपवास करताय? या गोष्टींची विशेष काळजी घ्या, अन्यथा येईल मोठं संकट

कलश स्थापनेदरम्यान पेरलेले जव दोन-तीन दिवसांत उगवते, पण ती उगवली नाही तर भविष्यात ते शुभ लक्षण मानले जात नाही.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com