प्रत्येक महिन्यात पौर्णिमा येते. असे मिळून वर्षभरात १२ पौर्णिमा येतात आणि प्रत्येक पौर्णिमेचे स्वत:चे असे महत्त्व आहे. परंतु वर्षातील चार पौर्णिमांपैकी कार्तिक, वैशाख, श्रावण आणि माघ महिन्यातील पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे.
माघी पौर्णिमेला स्नान, दान आणि जप करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी काही कामे करणे अशुभ असते. ज्यामुळे आपल्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पडतो. यंदा ही माघी पौर्णिमा २४ फेब्रुवारीला आहे. पौर्णिमा प्रारंभ तिथी २३ फेब्रुवारीला दुपारी ३.३३ मिनिटांनी होईल तर समाप्ती २४ फेब्रुवारी सायंकाळी ५.५९ मिनिटांनी संपेल.
माघी पौर्णिमेला अनेकजण व्रत करतात. असे मानले जाते की, गंगेत स्नान करून दान केल्याने देवताही प्रसन्न होतात. जाणून घ्या पौर्णिमेच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये.
या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळावे. याचा विपरीत परिणाम जीवनावर होतो.
ज्योतिषशास्त्रानुसार माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी गंगा स्नान केल्यानंतर धन दान करावे. यासोबतच पितरांची पूजा करणे देखील लाभदायक आहे. ज्यामुळे घरात सुख-समृद्धी नांदेल.
टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.