Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी जीममध्ये दिवसभर घाम गाळण्याची गरज नाही; फक्त सकाळी करा 'या' गोष्टी

Weight Loss Tips in Marathi: धावपळीच्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा सारख्या समस्या होतात.अनेकजण प्रयत्न करून सुद्धा त्याचे वजन कमी होत नाही. मात्र सकाळी या गोष्टी केल्यास तुमचे वजन झपाट्याने कमी होईल.
Weightloss
WeightlossCanva
Published On

धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे अनेकांना लठ्ठपणाच्या समस्या येत असतात. प्रौढ व्यक्तीलाच नाही तर लहान मुलांमध्ये देखील लठ्ठपणाच्या समस्या वाढल्यात. लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेकजण जीममध्ये व्यायामाचे धडे गिरवत असतात. पण पोषक आहार आणि नियमित व्यायाम केल्या तर जीममध्ये दिवस-दिवस घाम गाळण्याची गरज भासत नाही. यामुळे पोषण आहार घेतला शरीराला फायदे होत असतात. दरम्यान वाढलेल्या वजनामुळे आळशीपणा येतो आणि काम करताना कंटाळा येत असतो. तुम्हीही वाढलेल्या वजनामुळे चिंतेत असला किंवा त्या समस्येशी झुंजत असाल तर फिट दिसण्यासाठी सकाळी करत असलेल्या या चुका टाळा.

Weightloss
Weightloss During Monsoon: जीमची गरज नाही; पावसाळ्यात वजन कमी करण्यासाठी घरच्या घरीच करा 'हे' सोपे व्यायाम

सकाळी दिवसाची सुरुवात पाणी किंवा डिटॉक्स वॉटर पिऊन करा.यामुळे तुमच्या शरीरातील अनेक खराब कॅलरीज कमी होण्यास मदत होईल.डिटॉक्स वॉटर बनवण्यासाठी लिंबू, काकडी, पुदीना रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी उठल्यावर याचे रिकाम्या पोटी सेवन करा. सकाळी पाणी प्यायल्यास शरीरातील चरबी वितळते. तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. लिंबामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे वजन झपाट्याने कमी होते आणि बॉडी डिटॉक्सिफिकेशन देखील होते.

सकाळी नियमित चालण्याचा व्यायाम करा - यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि वजन कमी होण्यास मदत होते.माहितीनुसार सकाळी अर्धा तास चालल्यास शरिरातील चयाचाप वाढते. त्यासोबतच वजन कमी होण्यास मदत होते. योगा,ध्यान आणि योगा केल्यास वजन नियंत्रित राहते आणि पोटासंबंधीत समस्या दूर होतात. वजन कमी करण्यासाठी योग्य आहारदेखील महत्त्वाचे आहे. कामामुळे अनेकजण घाई-घाईत नाश्ता करतात मात्र त्यामुळे शरीराला आवश्याक पोषण मिळत नाही आणि वजन वाढते.आहारात अंडी, दही,मासे,फळं आणि भाज्यांचा समावेश करा. यांच्या सेवन केल्यास शरीरातील रक्ताची पातळी नियंत्रित राहते त्यासोबत चयाचाप देखील वाढत असते.

वजन वाढण्याचे अनेक कारणं असू शकतात. तणाव आणि जंक फूडच्या सेवनामुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते. त्यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते. वाढलेल्या वजनामुळे हृदयविकार, सांधेदुखी, अंगावा सूज येणे या सारख्या समस्या होऊ शकतात. या समस्या होऊ, नये म्हणून वजन नियंत्रित ठेवा आणि त्यासोबतच योग्य व्यायाम करा.

Weightloss
Weight Loss Tips : पोट सुटलंय अन् मांड्या एकमेकांना घासल्या जातात? घरच्याघरी करा आराम देणारा रमबाण उपाय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com