

नुकताच दिवाळीचा सण पार पडला. या सणाला फराळासोबत मिठाई सुद्धा मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. त्याने शरीरातील शुगरची पातळी वाढते. ही समस्या जर तुम्हालाही जाणवत असेल तर पुढे तुम्हाला काही पौष्टिक पेयांबद्दल माहिती देण्यात आली आहे. जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. तुमच्या माहितीसाठी, जर तुम्ही हे पेये नियमितपणे पिण्यास सुरुवात केली तर तुमचे आरोग्य मोठ्या पटीने सुधारु शकते असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.
आवळ्याचा रस
आयुर्वेदानुसार, आवळ्याचा रस तुमच्या आरोग्यासाठी वरदान ठरू शकतो. मधुमेहींना आवळ्याचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्हाला तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करायची असेल तर दररोज सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा रस पिण्यास सुरुवात करा. आवळ्याच्या रसाची चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यात काळे मीठ देखील घालू शकता.
दालचिनीचे पाणी प्या
दालचिनीच्या पाण्यातील घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास प्रभावी ठरू शकतात. एक कप पाण्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर मिसळा, ते उकळवा आणि गाळून घ्या. पाणी कोमट झाल्यावर, तुम्ही ते सकाळी लवकर रिकाम्या पोटी पिऊ शकता.
मेथीचे पाणी फायदेशीर ठरेल
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी मेथीचे पाणी देखील पिऊ शकता. रात्रभर एक ग्लास पाण्यात एक चमचा मेथीचे दाणे भिजवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी गाळून घ्या. पाणी पिण्याव्यतिरिक्त तुम्ही भिजवलेले मेथीचे दाणे चावू शकता. मधुमेहाच्या रुग्णांसाठी मेथीचे पाणी खूप फायदेशीर ठरू शकते.
टीप: या लेखात सुचवलेल्या टिप्स फक्त सामान्य माहितीसाठी आहेत. कोणताही फिटनेस सुरू करण्यापूर्वी, आहारात बदल करण्यापूर्वी किंवा कोणत्याही वैद्यकीय स्थितीसाठी इतर कोणतेही उपाय करण्यापूर्वी नेहमीच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. साम टीव्ही कोणत्याही दाव्यांची सत्यता पडताळत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.