

आपल्या प्रत्येकाला वाटतं की, घरात शांती राहावी. मात्र अनेकदा घरात सतत भांडणं होतात. याचं कारण आपल्याला कळत नाही. इतकंत नाही तर अनेक घरांमध्ये पैशांची सतत नासाडी होते, वातावरण गंभीर असतं आणि कुटुंबातील सदस्य सतत तणावात असतात. याशिवाय कुटुंबातील सदस्य आजारी पडत राहतात, मतभेद किंवा आर्थिक समस्या सुटत नाहीत.
जर कुटुंबातील सदस्य मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असतील तर घराची वास्तू योग्य नसू शकते. अशा परिस्थितीत, काही विशेष उपाय केल्याने या समस्या कमी होऊ शकतात. तुमच्या घरासाठी कोणते उपाय प्रभावी ठरू शकतात ते जाणून घ्या.
जर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक, ओम किंवा इतर शुभ चिन्ह कुंकुचा वापर करून काढले तर घरात सकारात्मक ऊर्जा येण्यास मदत होते. यामुळे नकारात्मक शक्ती घराला स्पर्शही करू शकणार नाहीत.
जर तुम्ही घरातील मुख्य दाराच्या हँडलला काळा धागा बांधलात तर नकारात्मक उर्जा घरात प्रवेश करू शकत नाही. यामुळे घरातील वातावरण चांगलं राहतं.
मुख्य दारावर एक लिंबू आणि सात हिरव्या मिरच्या लटकवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही असं म्हटलं जातं. हा उपाय फक्त शनिवारी किंवा मंगळवारी करा.
जर तुम्ही लिविंग रूममध्ये किंवा मुख्य प्रवेशद्वारावर तीन मोराचे पंख ठेवले तर घरावर कधीही वाईट नजर लागणार नाही. यामुळे घरात नेहमीच सकारात्मक ऊर्जा राहण्यास मदत होते.
वास्तुशास्त्रात मीठ आणि तुरटीचा वापर करून अनेक उपाया केले जाऊ शकतात. हे दोन्ही घटक नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात आणि घर सुरक्षित ठेवतात. आठवड्यातून दोनदा घर पुसताना, पाण्यात चिमूटभर सैंधव मीठ घाला. दुसरा उपाय म्हणजे बाथरूमच्या एका कोपऱ्यात एका काचेच्या भांड्यात फिटकरी ठेवा. यामुळे घराला वाईट नजर लागत नाही.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती वास्तू शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.