‘बाहुबली’ आणि ‘RRR’नंतर दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी आणखी एका नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. आत्तापर्यंत भारतीय सिनेसृष्टीत अनेक बायोपिक बनवले आहेत. पण आतापर्यंत कोणीही भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्यावर आधारित एकाही चित्रपटाची निर्मिती केलेली नाही. पण आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्यावर आधारित चित्रपट पाहायला मिळणार आहे.
‘मेड इन इंडिया’ असं या चित्रपटाचं नाव असून हा एक बायोपिक आहे. या बायोपिकची निर्मिती राजामौली यांचा मुलगा आणि निर्माता एसएस कार्तिकेय आणि वरुण गुप्ता यांनी केली आहे. तर बायोपिकचे दिग्दर्शन नितीन कक्कर करणार आहेत.
एसएस राजामौली यांनी ‘मेड इन इंडिया’ची अनाउंसमेंट करताना एक व्हिडीओ शेअर केली आहे. टीझर शेअर करताना एस.एस.राजमौली यांनी लिहिले की, “जेव्हा मी पहिल्यांदा चित्रपटाची कथा ऐकली, तेव्हा ही कथा ऐकून मी भावुक झालो. बायोपिकची निर्मिती करणं खूप कठीण काम आहे. पण भारतीय चित्रपटाच्या पितामहाची गोष्ट एका चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांना दाखवणं हे आव्हानात्मक आहे. पण आमची टीम त्यासाठी तयार आहेत. ‘मेड इन इंडिया’ची घोषणा करताना अपार अभिमान वाटतोय.” अशा आशयाचे त्यांनी ट्वीट केलं आहे. (Bollywood Film)
दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हटले जाते. त्यांनी १९१३ मध्ये देशातील पहिला फिचर फिल्म ‘राजा हरिश्चंद्र’ हा चित्रपट बनवला. पण भारतीय चित्रपटसृष्टीला जन्म देण्यासाठी दादासाहेब फाळके यांना खूप पापड करावे लागले. महिलांनी चित्रपटात काम करायला सुरुवात केली तर ती त्यांच्यामुळेच.
दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटसृष्टी सुरू केली तर खरी पण त्यांच्याकडे चित्रपट बनवण्याचे कोणतेही साधन नव्हते. पण त्यांनी धीर सोडला नाही. आता एस.एस.राजामौली यांची कथा रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.एका मीडिया रिपोर्टनुसार, एस.एस.राजामौली चित्रपटामध्ये ‘भारतीय चित्रपटाचा जन्म आणि उदय’ ही कथा चित्रपटामध्ये सांगणार आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.