Shekhar Suman: अलिकडेच, प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) बॉलिवूडमधील ‘घृणास्पद’ सत्य उघड केले असून नुकतंच सुप्रसिद्ध अभिनेता शेखर सुमननेही (Shekhar Suman) तिच्यासोबतच अनेक बॉलिवूडवर टिका करत आपले परखड मत मांडले.
यावेळी शेखरने बॉलिवूडमध्ये प्रियांकासोबत घडलेला किस्सा सांगितला. सोबतच, तिच्यावर दादागिरी करत, बॉलिवूड सोडण्यासाठी सांगितले होते, हा किस्सा देखील सांगितला, सोबतच शेखरने न विसरता, सुशांत सिंग राजपूतचा (Sushant Singh Rajput) संदर्भ देत त्याच्याविरुद्ध कसे घडले याची माहिती दिली.
शेखरचा मुलगा अध्ययन सुमन यांच्याविरुद्धही कट रचण्यात आला होता, असेही तो म्हणाला. त्याला अनेक चित्रपटांमधून काढून टाकण्यात आले. फक्त आपल्या लोकांना पुढे न्यायचे होते. आपल्या विरोधात कट रचणाऱ्या इंडस्ट्रीतील त्या लोकांना तो चांगलं ओळखतो.
शेखर सुमनने एका इंग्लिश वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, एका षडयंत्राने त्यांच्या मुलाची सिनेकारकीर्द कशी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला याबद्दल शेखरने सांगितले. सुशांत सिंग राजपूतलाही त्याच्या कारकिर्दीत अशाच नुकसानीचा कसा सामना करावा लागला याची आठवणही त्यांनी केली.
शेखर सुमन म्हणतो, ‘मी आणि प्रियंका चित्रपट उद्योगात काम करणाऱ्या या ग्रुपबद्दल बोललो आहोत. हे जवळजवळ माफियासारखे आहे, जे प्रॉडक्शन, कास्टिंग, जवळजवळ सर्व काही नियंत्रित करतात. ते नेहमीच नेपोटिझम करत आपल्या चित्रपटात ओळखीच्या कलाकारांनाच कास्ट करतात. बाहेरुन जर कोण बॉलिवूडमध्ये येताना दिसले तर त्यांच्या सोबत आपलं जुळत असेल तर बोलतात नाही तर, त्याला उद्ध्वस्त करतात. हे गेल्या काही काळापासून सुरू आहे. सुशांतही त्याचाच बळी ठरला होता. चांगली कामगिरी करूनही अचानक वाटते की आपली कारकीर्द संपुष्टात आली आहे. हेच त्याच्या नैराश्याचे कारण आहे.’
शेखर सुमन पुढे म्हणतात, ‘प्रियंका चोप्राने जेव्हा याचा खुलासा केला सर्वांनाच आश्चर्य वाटले. या गोष्टी सांगण्याइतपत ती हिंमत करत होती. जर, प्रियंकासोबत हे घडू शकतं तर कुणासोबतही बॉलिवूडमध्ये हे होऊ शकतं. मिस वर्ल्ड आणि एक यशस्वी अभिनेत्री असूनही, तिला बाजूला केले जाऊ शकते आणि तिला कास्ट केले जात नाही हे पूर्णपणे असहाय्य वाटू शकते. ती हॉलिवूडमध्ये गेली ही वेगळी गोष्ट आहे, पण प्रत्येकाच्या बाबतीत असे होऊ शकत नाही.’
अध्यायन प्रसिद्ध झाल्यापासून मला समजले की, त्याच्या विरोधात ठोस प्रयत्न केले जात आहेत. मला बरोबर आठवत आहे की, टाईम्स ऑफ इंडियाने भविष्यातील पाच सुपरस्टार्सबद्दल भाकीत केले होते आणि या पाच जणांमध्ये अध्यायनचा समावेश होता, यामध्ये एक टोळी एक कार्यरत होती, त्यांना फक्त त्यांचेच लोक पुढे न्यायचे होते. आणि त्यामुळेच तो फसला, कारण अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. तो लढला आणि आता संजय लीला भन्साळींच्या चित्रपटासाठी त्याने स्वाक्षरी देखील केली आहे. शेवटी आपण कोणाला थांबवू शकत नाही.
बॉलिवूड सोडलेल्या अभिनेत्याला यशस्वी पुनरागमन करणे अवघड आहे का? या प्रश्नाच्या उत्तरात शेखर म्हणतो, ‘मला तसे वाटत नाही. आजच्या काळात अनेक सेलिब्रिटी बॉलिवूडमध्ये आणि हॉलिवूडमध्ये काम करत आहेत. प्रियांका हॉलिवूडमध्ये गेली आणि परत आली आणि इथे काम केलं. प्रियांकाला खरोखरच धमकावले गेले होते आणि तिला अक्षरशः निघून जाण्यास सांगितले होते. त्यामुळे तिने हॉलिवूडमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. सुदैवाने ती यशस्वी झाली. हा बॉलिवूडचा तोटा तर हॉलिवूडचा फायदा झाला.’
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.