
Malaika Arora: सोशल मीडियावर रिॲलिटी शोबद्दल खूप चर्चा आणि ट्रॉलिंग होत असते. काही शो हे विथ स्क्रिप्ट असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत . सध्या, अभिनेत्री आणि डान्सर मलायका अरोरा हिने रिॲलिटी शोजच्या पटकथेवरून निर्माण झालेल्या वादावर तिचे मत मांडले. या वादावर चर्चा करताना तिने अशा शोजमध्ये ड्रामा आवश्यक आहे का या प्रश्नाचे उत्तर देत रिॲलिटी शो पडद्यामागे कसे असतात याबद्दल माहिती दिली आहे.
हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना, मलायकाने कबूल केले की रिॲलिटी टेलिव्हिजनला प्रेक्षक किंवा नेटकरी सर्वात जास्त ट्रॉल करतात. इतरांना असे वाटते की रिॲलिटी कार्यक्रम पटकथेवरून दाखवले जातात, परंतु तिने या रिॲलिटी शोमधील खरोखर घडणाऱ्या गोष्टींवर भर दिला.
प्रेक्षकांना असेच वाटते की प्रत्येक रिॲलिटी शो हा स्क्रिप्टच्या माध्यमातून तयार केला जातो. प्रेक्षकांना असे नक्कीच वाटू शकते कारण टीव्हीवर पाहताना ते नाटयमय वाटते. आपण खऱ्या अर्थाने असं नसत. खरंच काही भावनिक प्रसंग घडतात आणि शेतकरील लोकांना रडू येत. अस्वस्थ होतो. हिप हॉप इंडिया २ मध्ये रोना-धोना हा प्रकार नाही आहे त्यामुळे ते खऱ्या अर्थाने उत्तम रिॲलिटी शो दिसतो. असे पुढे ती म्हणाली.
विविध रिॲलिटी टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शक आणि जज म्हणून अनुभव असल्याने, मलायकाने स्पर्धक भावना फार जवळून अनुभवल्याचे सांगोतले आहे. मलायका सध्या हिप हॉप इंडिया २ या डान्स शोमध्ये जज म्ह्णून काम करत आहे. या शोमधील तिचे डान्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.