

शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून सरकार अनेक योजना राबवत आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. हे पैसे ४ महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जातात. आता शेतकरी या योजनेचा २३ वा हप्ता घेणार आहेत. पण तुम्ही जर पुढील गोष्टी केल्या नाहीत तर तुम्हाला पुढे कोणताच हप्ता मिळणार नाही.
पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana 23rd Installment) लाभ आत्तापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी घेतला आहे. पण २२ वा हप्ता बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाला नव्हता. याचं कारण म्हणजे त्यांनी ईकेवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नव्हती. तसेच आता अॅग्रीस्टॅक (agristack)आयडी शेतकऱ्यांकडे असणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
तुम्ही शेतकरी असाल आणि सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्याकडे हा Farmer ID असणं बंधनकारक आहे. तुम्हाला हा आयडी हवा असेल तर तुम्ही मोबाईलवरून किंवा जवळच्या महा-ई सेवा केंद्रावर (csc) जाऊन नोंदणी करू शकता. त्यासाठी तुमच्याकडे काही कागदपत्रे असणे आवश्यक आहेत ती पुढील प्रमाणे आहेत.
आधार कार्ड जे मोबाईल नंबरशी लिंक केलेले असावे
जमिनीचा 7/12 आणि 8 अ उतारा
बॅंकेचे पासबुक ईकेवायसी केलेले
तुम्ही अजून ईकेवायसी केली नसेल तर तुम्हाला पुढील हप्ता मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो करून ही प्रोसेस फॉलो करावी लागेल.
पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटला म्हणजेच (https://pmkisan.gov.in/) ला भेट द्या.
ईकेवायसी हा पर्याय निवडा
पुढे तुमचा आधार कार्डचा नंबर अचूक पद्धतीने लिहा.
तुम्हाला रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ओटीपी आलाय का ते तपासा.
आता ओटीपी सबमिट करा.
शेवटी ईकेवायसीची दिलेली प्रोसेस करून पुन्हा सबमिट करा.