

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही देशातल्या कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार ठरत आहे. शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी २ हजार रुपयांचा हप्ता दिला जातो. पण अनेकांच्या मनात एक महत्वाचा प्रश्न कायम असतो. तो म्हणजे, एका कुटुंबातील वडील आणि मुलाला दोघांनाही या पी PM Kisan Samman Nidhi योजनेचा लाभ घेता येतो का? याचे सरकारी नियम जाणून घेऊयात.
सरकारी नियमांनुसार पीएम किसान योजनेचा लाभ हा एका कुटुंबातल्या फक्त एकाच पात्र शेतकऱ्याला दिला जातो. या योजनेत कुटुंब म्हणजे पती, पत्नी आणि अप्लवयीन मुलं असा विचार केला जातो. त्यामुळे सामान्य परिस्थितीत एका घरातील प्रत्येक सदस्याला या योजनेचा लाभ घेता येत नाही.
काही महत्वाच्या अटींमध्ये वडील आणि प्रौढ मुलगा या दोघांनाही या योजनेचा लाभ घेता येतो. त्यामध्ये जर वडील आणि मुलाच्या नावावर स्वतंत्रपणे शेतीची जमीन सरकारी महसूल नोंदीत नोंदवलेली असेल, तर दोघेही पात्र ठरतात. पण यासाठी मुलगा पौढ असणं गरजेचं आहे. पण जमीन फक्त वडिलांच्या नावावर असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता १३ मार्च २०२६ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. सरकारकडून दर चार महिन्यांनी हा हप्ता दिला जातो. तसेच २३ वा हप्ता हा जुलै २०२६ मध्ये येण्याची शक्यता आहे. पण याबाबत सरकारने आत्तापर्यंत अधिकृत घोषणा केलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.