
जुन्या पीक योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे. या योजनेतील गैरकारभाराबाबत अनेक शेतकऱ्यांना नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे त्यात सुधारणा करून नवीन पीकविमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेऐवजी शेतकऱ्यांच्या विकासासाठी व शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवणारी नवी योजना सुरू करण्यात येत आहे.
राज्यात पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी ‘कृषी समृद्धी’ योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधान परिषदेत दिली.सुधारित पीकविमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. विविध जिल्ह्यांतील शेतकरी वर्ग नाराज होता.
राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकार वेगळी योजना आणणार आहे का, असा प्रश्न आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी विधान परिषदेत केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री कोकाटे म्हणाले की, अनेक विमा कंपन्या आणि काही सीएससी केंद्रांमार्फत गैरप्रकार झाल्याचे आढळून आल्याचं सांगितलं. विमा कंपन्यांनी तब्बल १,००,००० कोटी रुपयांचा नफा कमावला.
इतके पैसे या विमा कंपन्यांना देण्यापेक्षा तेच पैसे थेट शेतकऱ्यांच्या शेतीतील भांडवली गुंतवणुकीसाठी का वापरण्यात येऊ नये, असे सांगत त्यांनी नव्या योजनेचे समर्थन केलं. ‘कृषी समृद्धी’ योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अल्प दरात विमाकवच देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांकडून खरिपासाठी २ टक्के, रब्बीसाठी १.५ टक्के आणि नव्या पिकांसाठी ५ टक्के इतकी आकारणी केली जाणार आहे. उर्वरित रक्कम राज्य सरकार भरेल.
‘कृषी समृद्धी’ योजनेत विमा कंपनी बदलण्याऐवजी नियमांची काटेकोर अंमलबजावणी व पारदर्शक ट्रिगर प्रणाली ठेवण्यात आलीय. याबरोबरच राज्य सरकारची स्वतःची विमा कंपनी स्थापन करण्याचा कोणताही विचार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.