वरळी डोममध्ये पार पडलेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेचा संयुक्त विजयी मेळावा महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारा ठरला आहे. त्रिभाषा धोरणाविरोधातील जनभावना लक्षात घेता सरकारने घेतलेली माघार आणि त्यानंतर झालेला हा मेळावा केवळ विजयाचा नव्हे, तर एकतेचा आणि नव्या सुरुवातीचा संकेत देणारा आहे.
या मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर आले, त्यांच्या उपस्थितीत संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र आले, आणि हे दृश्य महाराष्ट्रासाठी भावनिकदृष्ट्या महत्त्वाचं ठरलं.राजकीय मतभेद विसरून एकत्र आलेल्या या नेतृत्वामुळे भविष्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे.या मेळाव्याने मराठी अस्मिता, भाषेचा अभिमान आणि जनतेच्या हक्कांसाठी लढा यावर नव्यानं प्रकाश टाकला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.