Video

Maharashtra Politics: तुकडाबंदी- तुकडेजोड कायदा रद्द होणार? दांगट समितीचा सरकारला शिफारस

Tukde Bandi Act: उमाकांत दांगट समितीने तुकडाबंदी-तुकडेजोड कायदा रद्द करण्याची शिफारस केली आहे. जमिनीच्या नकाशा आणि रेकॉर्डमध्ये विसंगती असल्याने पुनर्मोजणीची गरज असल्याचे समितीचे मत आहे, ज्यामुळे कायद्यात बदल शक्य आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उमाकांत दांगट समितीने तुकडाबंदी-तुकडेजोड कायदा रद्द करण्याची शिफारस राज्य सरकारला केली आहे. जमिनीच्या नकाशा आणि रेकॉर्डमधील विसंगतीमुळे पुनर्मोजणी आवश्यक असल्याचे समितीने नमूद केले आहे. महसूल कायद्यामध्ये बदल करण्यासाठी राज्य सरकारने माजी सन अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन केली आहे. या शिफारसीमुळे तुकडाबंदी-तुकडेजोड कायदा रद्द होण्याची शक्यता वाढली आहे. एकत्रितपणे जमिनीची व्यवस्था सुधारण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय ठरू शकतो. आता या शिफारसींवर सरकार काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

काय आहे राज्यातील स्थिती?

1. बॉम्बे लॅण्ड अ‍ॅक्टमध्ये दर ३० वर्षांनी जमिनींची पुनर्मोजणीची गरज आहे.

2. पण १९१० नंतर जमिनींची मोजणी झालेली नाही.

3. राज्यात जमिनींचे तुकडे पाडून अथवा कुटुंबात जमिनींचे वाटप होतं.

4. सातबारा उताऱ्यावर खातेदारांप्रमाणे जमिनींचे तुकडे पडलेले नाहीत.

5. गाव नकाशे आणि रेकॉर्डवरील क्षेत्र यामध्ये मोठी तफावत आपल्याला बघायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राममंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात? पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली?

तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध? महाराष्ट्रात भेसळमाफियांचा उच्छाद, भेसळमाफियांना होणार थेट मृत्यूदंडाची शिक्षा?

SCROLL FOR NEXT