Video Saam Digital
Video

Video : बच्चू कडूंनी वाढवलं महायुतीचं टेन्शन, राजू शेट्टी, तुपकर, जरांगेंना घोतली साद

Tisari Aaghadi/Third Front In Maharashtra : बच्चू कडूंनी शेतकरी नेते राजू शेट्टी, रवीकांत तुपकरांसह मराठा आंदोलक मनोज जरांगेंनाही साद घालत विधानसभेच्या आधी तिसऱ्या आघाडीचे संकेत दिलेत.

Sandeep Gawade

विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. त्यातच महायुती आणि महाविकास आघाडीला मित्रपक्षांना सोबत ठेवताना मोठी कसरत करावी लागत आहे. मात्र आता महायुतीचा घटकपक्ष असलेल्या बच्चू कडूंनी आता महायुतीचं टेंशन वाढवणारा निर्णय घेतलाय. बच्चू कडूंनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना थेट शेतकरी नेते राजू शेट्टी, रवीकांत तुपकरांसह मराठा आंदोलक मनोज जरांगेंनाही साद घालत तिसऱ्या आघाडीचे संकेत दिलेत.

राज्यातील सत्तांतरापासून बच्चू कडूंना मंत्रिपदाची आशा होती. मात्र विधानसभा निवडणूक आली तरी बच्चू कडूंना मंत्रिपदापासून उपेक्षित रहावं लागलं. त्यातच लोकसभा निवडणूकीपासून बच्चू कडूंचे सूर बदलले आहेत. त्यामुळे बच्चू कडूंनी राज्यात शेतकऱ्यांची आघाडी स्थापन करून मनोज जरांगेंसह मोट बांधली तर महायुतीचं टेंशन वाढणार आहे. त्यामुळे बच्चू कडूंनी केलेल्या आवाहनाला जरांगेंसह शेतकरी नेते काय प्रतिसाद देतात? यावरून आगामी काळातील सत्तेचं समीकरण ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT