Ravikant Tupkar farmer protest News : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी नागपुरात एक वादग्रस्त विधान करून खळबळ उडवून दिली आहे. सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला असून, कर्जमाफीसाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तुपकरांनी शेतकऱ्यांना रोखताना एक धक्कादायक विधान केलं. 'जसं बच्चूभाऊंनी सांगितलं की, दोन-चार आमदारांना कापा. तसं मी सांगतो की, दोन-चार मंत्र्यांना कापा,' असे रविकांत तुपकर म्हणाले. यापूर्वी आमदार बच्चू कडू यांनीही असेच विधान केले होते, त्यामुळे आता तुपकरांच्या या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कर्जमाफीशिवाय माघार घेणार नाही, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.