Siddhi Hande
महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात भाकरी बनवली जाते. तांदूळ, भाजरी आणि ज्वारीची भाकर बनवली जाते.
भाकरी या अनेकदा कडक होतात. सकाळी केलेल्या भाकऱ्या दुपारी पूर्णपणे कडक झालेल्या असतात. त्यामुळे चांगल्या लागत नाही.
तांदळाची भाकर ही मऊसूत असेल तरच चांगली लागते. त्यासाठी या टीप्स फॉलो करा.
भाकरीचं पीठ मळताना नेहमी कोमट पाण्यात मळा. गार पाण्यात भाकरीचं पीठ मळल्याने कडक होते.
पीठ मळल्यानंतर तुम्ही एक १०-१५ मिनिटे झाकून ठेवा. जेणेकरुन पीठ छान मुरेल.
पीठात थोडे तेल घातले तरी चालते. यामुळे भाकरी छान फुलते. तुमची भाकर कधीच वाताड होणार नाही.
भाकरी बनवून झाल्यावर ती मंद गॅसवर भाजून घ्या.
भाकरी तव्यावर टाकल्यावर त्यावर एका बाजूने पाणी लावून घ्या. जेणेकरुन ती कोरडी होत नाही.
तुम्ही तांदळाच्या पीठाची उकड काढूनदेखील भाकरी करु शकतात. उकड काढलेली भाकर कधीच कडक होत नाही.
Next: होळी करा स्पेशल घरच्या घरी बनवा टेस्टी आणि रसाळ राजभोग रेसिपी, नोट करा सोपी रेसिपी