Rahul Gandhi on PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलेल्या आवाहनावरून राहुल गांधी यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. मोदींनी जनतेकडून केलेला उपदेश नसून त्यांच्या नाकामीचे आणि अपयशाचे पुरावे आहेत, असा थेट आरोप राहुल गांधींनी केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभर सोनं खरेदी न करण्याचे आवाहन भारतामधील जनतेला केले होते. त्यावरून आता विरोधकांनी मोदींना लक्ष केलेय.
पंतप्रधान मोदी यांनी रविवारी जनतेला त्याग करण्यास सांगितले. सोनं खरेदी करू नका, परदेशात जाऊ नका, कमी पेट्रोल वापरा, खते आणि खाद्यतेलाचा वापर कमी करा, मेट्रोने प्रवास करा, घरून काम करा. हे उपदेश नाहीत तर हे अपयशाचे पुरावे आहेत. मागील १२ वर्षांत देश अशा टप्प्यावर पोहोचला आहे की, जनतेला काय खरेदी करावे, काय करू नये, कुठे जावे आणि कुठे जाऊ नये हे सांगावे लागते. प्रत्येक वेळी ते जबाबदारी जनतेवर ढकलतात, जेणेकरून ते स्वतः उत्तर दायित्वातून सुटू शकतील. देश चालवणे आता एका तडजोड केलेल्या पंतप्रधानांच्या हातात राहिलेले नाही, असा हल्लाबोल राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.