मुंबईनंतर आता मीरा-भाईंदर आणि ठाणे या शहरांमध्येही पॉड टॅक्सी प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया वेगाने सुरु झाली आहे. मीरा-भाईंदर आणि ठाण्यात घोडबंदरपर्यंत प्रचंड वाहतूककोंडी होत असल्यामुळे हा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे महामुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार असून, पर्यावरणपूरक आणि आधुनिक प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. या परिवहन विभागाकडून प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच डीपीआर तयार करण्याची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला एमएमआरडीए ला सोपवल्याची माहिती विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.