कांद्याचे दर पडल्यामुळे शेतकरी रड कुंडीला आला आहे. शेतकऱ्यांना ५०० कोटींचा फटका बसला आहे. नाशिकमधील शेतकरी दुहेरी संकटात आहेत.एकीकडे पडलेले बाजारभाव तर दुसरीकडे वातावरणातील बदलामुळे कांदा शेतातच सडण्यास सुरुवात झाली.
मागील महिन्यात झालेला अवकाळी पाऊस, कमी झालेली थंडी आणि धुक्याचा कांद्याला मोठा फटका बसला. लाल कांद्याची वाढ खुंटली, शेतातच कांदा करपायला सुरुवात झाली. कांद्याचं उत्पादन निम्म्याने घटलं, शेतकरी चिंताग्रस्त आहेत. ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे फवारणीचा खर्च देखील वाढला.
कांद्यासाठी प्रती एकर शेतकऱ्यांना ८० ते ९० हजार रुपयांचा खर्च आहे. मात्र नैसर्गिक बदलांमुळे उत्पादन घटल्याने उत्पादन खर्च, मजुरी आणि वाहतूक खर्च देखील वसूल होत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत. आधीच कांद्याचे पडलेले भाव, त्यात अपरिपक्व कांद्याला बाजारात उठाव नसल्यानं मिळेल त्या कवडीमोल भावात कांदा विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.