पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. दहशतवादा विरोधात भारताने पाकिस्तान पोसत असलेल्या दहशतवाद्यांचा अड्डा भारताने उखाडून टाकला. यानंतर पाकिस्तानने पोकळ धमकी द्यायला सुरुवात केली आहे. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान कारवाई करण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे लक्षात घेता नागरी क्षेत्रात हल्ली झाल्यास काय उपाययोजना कराव्या यासाठी नागरी संरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत.
आज CSMT येथे मॉकड्रिल पार पडले. CSMT हे स्थानक अत्यंत महत्वाचे आहे 26/11 हल्ल्यामध्ये या स्थानकात देखील कसाब आणि त्याच्या साथीदारांनी हल्ला केला होता. त्यामुळे या स्थानकावर नागरिकांना प्रशिक्षण देण्यात आले. हल्ला झाल्यावर एकमेकांना कसे वाचवावे एकमेकांच्या मदतीने सर्वांचे संरक्षण कसे करावे असे प्रशिक्षण यावेळी देण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.