मनोज जरांगे यांच्या मागण्याचा सरकारकडून जीआर काढण्यात आला आहे. सरकारने काढलेला जीआर समोर आला आहे. हा जीआर साम टीव्हीच्या हाती लागला आहे. याच जीआरची मनोज जरांगे वाट पाहत आहेत. हा जीआर मिळाल्यानंतर मुंबई सोडणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले होते. जीआरमध्ये फसवणूक झाली तर मंत्री आणि नेत्यांना फिरून देणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे ८ मागण्या केल्या होत्या. या सर्व मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. याबाबतचा जीआर काढण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. काही तासांमध्ये हा जीआर मनोज जरांगे यांना देण्यात येणार आहे. काही तासांपूर्वीच मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी सरकारने मान्य केलेल्या मागण्यांची माहिती दिली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.