मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. हैदराबाद गॅझेटनुसार जर मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले नाही तर मला जून महिन्यात नाईलाजाने उपोषणाला बसावं लागेल असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी जालनामध्ये माध्यमांसी संवाद साधताना सांगितले की, 'कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी सरकारने समिती गठित केली आहे. सरकारने गोरगरिबांच्या भावनांशी खेळलं नाही पाहिजे. फडणवीसांनी मोठ्या मनाने जीआर काढला, शिंदेसाहेबांचा पण पाठिंबा मिळाला. मग आडवणूक का करायची. विखे पाटलांवरती समाजाने कधी न टाकलेला विश्वास टाकला आहे. शिंदेसाहेबांनी शोधलेल्या नोंदीचे प्रमाणपत्र दिले जात नाही. सरकारपेक्षा अधिकारी मोठे झाले का? जाणून-बुजून सरकार मराठा समाजाची पिळवणूक करत आहे. या पुढच्या काळात त्यांनी असं करू नये. नाही तर जून महिन्यात मला उपोषणाला बसावं लागेल. कारण जून महिन्यात मुलांचे ऍडमिशन असतात. सरकार जर विनाकारण वाटोळ करणार असेल तर मी ऐकणार नाही.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.