कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. भोगावती नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.दरम्यान, पंचंगंगा नदी ही दुथडी भरुन वाहते आहे. दोन महिन्यांमध्ये पंचंगंगा नदी पात्रा बाहेर पडलेली असल्याचे दिसून येत आहे. पावसामुळे पंचगंगा नदीची पातळी तब्बल ३५ फूटांवर पोहोचली आहे. त्यामुळे शहर आणि परिसरातील ५७ बंधारे पूर्णतः पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे. आणखी पावसाचा जोर कायम राहिल्यास पूरस्थिती तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.