मराठवाड्याच्या जलजीवनाचा आधार असलेलं जायकवाडी धरण सध्या अर्धवट भरलं असून पाणीसाठ्यात मोठी वाढ होत आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. या पुराचे पाणी थेट जायकवाडी धरणात येत असून त्यामुळे धरणाच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.
कालपासून धरणात पाण्याची आवक आणखी वाढली असून केवळ २४ तासांत पाणीसाठ्यात सुमारे ६ टक्क्यांनी वाढ झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे सध्या धरणाचा एकूण पाणीसाठा ५२ टक्क्यांवर पोहोचला आहे, ही मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी मानली जात आहे.
सध्या जायकवाडी धरणात तब्बल २४,१९२ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. जलसंपदा विभागाचे अधिकारी सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. धरण परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.आगामी काही दिवसांत नाशिक आणि परिसरात पावसाचा जोर कायम राहिल्यास धरण आणखी भरून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.