९ लाख ३२ हजार कोटी इतके महाराष्ट्रावर कर्ज आहे. कर्ज काढून राज्य चालवले जात आहे. राज्य लुटले जात आहे. राज्यावरचा कर्जाचा डोंगर वाढत असतांना देखील लाडकी बहीण योजना आणली. आता ती बंद होण्याच्या मार्गावर आहे, शिवभोजन थाळी,आणि शिधा अशा गोरगोरिबांच्या अशा अनेक योजना बंद केल्या असून लवकरच लाडकी बहीण योजना देखील बंद होणार असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार प्रहार केला आहे.
पुढे ते म्हणाले, निवडणुकीच्या काळात महिलांची मतं विकत घेण्यासाठी राज्याच्या तिजोरीचा या सरकारने वापर केला.तसेच महायुतीच्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणीना २१०० रुपये आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी या त्यांच्या घोषणा आहेत. हे उत्तर या राज्याच्या जनतेला हव आहे तसेच जो काही या राज्यावर कर्जाचा भार आहे. तो सरकार कसा कमी करणार असा सवाल संजय राऊत यांनी सरकारला केला.महायुतीने नुकताच सादर केलेल्या अर्थसंकल्पावर संजय राऊत यांनी सडकून टीका केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.