महाराष्ट्र सरकारने फास्ट टॅग संदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या 1 एप्रिलपासून प्रत्येक टोल नाक्यावर फास्ट टॅग लावणे बंधनकारक असणार आहे. MSRDC ने हा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही रोख,कार्ड किंवा फोनपे आणि गुगलपेद्वारे टोल भरला तर तुम्हाला टोलचे दुप्पट पैसे भरावे लागणार आहे. असा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे.
मुंबईतील पाच टोलनाके हे MSRDC कडे आहेत. यामध्ये मुलुंड पश्चिम, मुलुंड पूर्व, ऐरोली, दहिसर, आणि वाशी या पाच टोल नाक्यांवर हलकी वाहने, शाळेच्या बस तसेच राज्य परिवहन बस यांना कुठलाही आकाराला जात नाही.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, जुना मुंबई-पुणे महामार्ग, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, वांद्रे-वरळी सी लिंक, सोलापूर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प, नागपूर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प, कटोल बायपास आणि चिमुर-वरोर-वणी महामार्ग देखील MSRDC कडे असल्यामुळे या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या नागरिकांना फास्ट टॅग अनिवार्य असेल. अन्यथा वाहनधारकांना दुप्पट पैसे भरावे लागतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.