Central Railway Saam TV
Video

Central Railway : वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेचा दिलासादायक निर्णय, आषाढी वारीसाठी ८० विशेष रेल्वेगाड्या|VIDEO

Pandharpur Vitthal Rukhmini Mandir : वारी काळात वाढत्या गर्दीचा विचार करुन मध्य रेल्वेने मोठी घोषणा केली आहे. वारीच्या काळात अनारक्षित गाड्यांचे फेरे सुरू राहणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेकडून मोठी सुविधा देण्यात आली आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी लाखो भाविक महाराष्ट्राच्या विविध भागातून आणि शेजारच्या राज्यांमधून येतात. त्यांच्या प्रवासाला अधिक सुलभ आणि सुरक्षित बनवण्यासाठी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून १ ते १० जुलै दरम्यान ८० जादा विशेष गाड्यांचं नियोजन करण्यात आलं आहे.

या विशेष गाड्या मराठवाडा, विदर्भ आणि कर्नाटक या भागातून पंढरपूरकडे येणाऱ्या भाविकांसाठी असतील. रेल्वेप्रशासनाने वारकऱ्यांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून अनारक्षित डब्यांच्या गाड्यांचेही अतिरिक्त फेरे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वारीच्या काळात होणारी गर्दी नियंत्रणात ठेवता येईल, तसेच हजारो भाविकांना वेळेवर आणि आरामदायी प्रवास करता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयात 2 कोटी 38 लाख रुपयांचा अपहार

Pakistan Blast : पोलीस चौकीवरील हल्ल्यात 21 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू, पाकिस्तान हादरले

प्रसिद्ध गायिकेची निर्घृण हत्या; जंगलात आढळला जळालेला मृतदेह, चाहत्यांमध्ये खळबळ

Helmet Expiry Date Checking Tips: हेल्मेट किती वर्षे वापरावे? 'हे' आहेत हेल्मेट बदलण्याचे 3 महत्त्वाचे संकेत; आजच तपासा

Aai Bhadyane Hawi: आईच्या प्रेमाची वेगळी मांडणी; मातृदिनानिमित्त केदार शिंदेंच्या 'आई भाड्याने हवी?'ची घोषणा

SCROLL FOR NEXT