.भुजबळांनी महायुतीला खबरदारीचा इशारा दिला. याला कारणही तसंच आहे.. एक म्हणजे मनुस्मृती आणि दुसरं म्हणजे लोकसभा निवडणुकीतला भाजपचा 400 पारचा नारा...भाजपनं आपल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी 400 पारचा नारा दिला खरा..मात्र भाजपच्या काही नेत्यांनी याला थेट संविधान बदलाशी जोडलं आणि हा नारा भाजपच्या अंगलट आला. कारण खरंच संविधान बदलणार की काय अशी भीती दलित आणि वंचित घटकांमध्ये पसरल्याचा दावा भुजबळांनी अनेकदा बोलून दाखवला. एवढंच नव्हे तर स्वत: नरेंद्र मोदींनाही यावर जाहीर भाषणांमधून स्पष्टीकरण द्यावं लागलं. मात्र हा वाद शमत नाही तोवर मनुस्मृतीचे श्लोक शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यावरून महायुती सरकारनं पुन्हा वाद नवा ओढवून घेतला. त्यामुळे अस्वस्थ भुजबळांनी भाजपचे चांगलेच कान टोचले आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.