
साताऱ्यातील फलटण तालुक्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डॉक्टरांच्या बनावट सही शिक्क्याचा वापर करून विमा कंपनीची फसवणूक करणाऱ्या चौघांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामधील एकाला फलटण तालुका पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर तिघांचा पोलीस शोध घेत आहेत. खामगाव येथील डॉ.ब्रह्मानंद टाले या पॅथॉलॉजिस्ट डॉक्टरांच्या तक्रारीवरून फलटण पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अकोला शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली.. रात्री साडे 7 वाजतापासून अकोल्यात मुसळधार पाऊस होत आहे. अकोला शहरासह मोठी उमरी, गुडधी, यावलखेड, सांगळूद, बाबुळगाव, बोरगावसह परिसराला पावसानं झोडपून काढल.. पावसामुळे हॉटेल विक्रेत्यांसह अकोलेकरांची चांगलीच धावपळ झाली.
मराठा आरक्षणाबाबत फडणवीसांचे छत्रपती संभाजीनगरमध्ये लागले होर्डिंग
महाराष्ट्रात १९६० पासून गेल्या ६४ वर्षाच्या काळात आता पर्यंत एकूण १२ मराठा मुख्यमंत्री झाले.
मग टार्गेट म्हणून देवेंद्र फडणवीसचं का?, म्हणून होर्डिंगवर उल्लेख
देवेंद्र फडणवीसांनी 2018 साली मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण दिले होर्डिंगवर उल्लेख
2021 साली उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडी सरकारने ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयात घालवले.
भरत कराड यांच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपयांची मदत आणि कुटुंबातील व्यक्तीला नोकरीत समाविष्ट करून घेण्यात या मागणीसाठी धनंजय मुंडे यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत – एका दिवशी 35 जणांना घेतला चावा
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची वाढती दहशत
एका दिवशी तब्बल 35 जणांना घेतला चावा
रुग्ण रुक्मिणीबाई रुग्णालय आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचाराधीन
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कर्देहळी येथे आज अचानक पडलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण कर्देहळी गावाला तलावाच्या स्वरूप आल्याचे या ठिकाणी चित्र दिसत आहे. संपूर्ण गावामध्ये चौकात चौकात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याचे चित्र दिसत आहे. गावानजीक असलेल्या ओढ्याला प्रचंड प्रमाणात पावसाचे पाणी आल्यामुळे ओढा दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र या ठिकाणी दिसत आहे.
- शरद पवार आजपासून ४ दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असणार आहेत.
- नाशिक जिल्ह्यातील आंबे दिंडोरीत दिवंगत दादासाहेब गायकवाड यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा
- शरद पवारांच्या हस्ते अनावरण दिवंगत दादासाहेब गायकवाड यांच्या पुतळ्याचं होणार अनावरण
सोलापूर गोवा विमानसेवा देणारे fly-91 कंपनीचे विमानसेवा आज रद्द
सोलापुरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने विमान रद्द झाल्याची विमानसेवा प्राधिकरणाची माहिती
आज संध्याकाळी 4 वाजता गोव्याहुन सोलापूरला येणारे विमान खराब हवामानामुळे उड्डाण घेऊ शकलेलं नाही
त्यामुळे गोवा-सोलापूर आणि सोलापूर-गोवा दोन्ही बाजूचे विमानसेवा आज रद्द
उद्या पुन्हा दुपारी 12.30 वाजता आजची विमान रेषेड्युल करण्यात आल्याची माहिती
मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू करून मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी केली होती त्यानंतर महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून शासनाने हैदराबाद गॅझेट अंमलबजावणी करण्याचे मान्य केलं आहे. अशातच सरकारने या मागण्या मान्य केल्याने राज्यात ठिकठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटो सह छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतानाचे फोटो देवाभाऊ म्हणून मोठ मोठे होर्डिंग् झळकले होते.त्या नंतर वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर देवाभाऊ या जाहिरातीनंतर आता गल्लो गल्ली आणि विविध कॉलन्यांमध्ये छोटे छोटे पोस्टर झळकताना पाहायला मिळत आहे. मात्र हे पोस्टर कोणी लावले आणि कधी लावले या मध्ये मोठी गुप्तता पाळण्यात येत आहे अनेक लोकांना आपल्या घराच्या कंपाउंडवर पोस्टर लावून गेले तेही माहित नसल्याचे समोर आले आहे. मात्र आता मोठ मोठे होर्डिंग्ज,बॅनर, वृत्तपत्र,टीव्ही आणि त्यानंतर गल्लो गल्ली पोस्टर लावणारे कोण याची चर्चा मात्र जोरात सुरू आहे.
वाशिमच्या रिसोड तालुक्यातील धोडप बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक अमोल अंभोरे हे मागील सात वर्षापासून या शाळेत कार्यरत होते. नुकतीच त्यांची बदली झाल्याने विद्यार्थ्यांनी निरोप समारंभाच्या कार्यक्रमात टाळ्यांच्या कडकडाटात आणि त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत त्यांना निरोप देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या आगळ्यावेगळ्या निरोप समारंभाने शिक्षक मात्र भारावून गेल्याचे चित्र बघायला मिळाल..
भंडाऱ्याच्या तुमसर पंचायत समितीचे भाजपचे माजी पंचायत समिती सभापती नंदू रहांगडाले यांनी त्यांच्या समर्थकांसह आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा भाजपला मोठा धक्का मानला जातोय. नंदू रहांगडाले हे सध्या भाजपचे पंचायत समिती गट नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांच्या नेतृत्वात नंदु रहांगडाले यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी मुंबई येथे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
सोलापुरात पुन्हा एकदा तुफान पावसाला सुरुवात
संपूर्ण सोलापूर शहरात तुफान पावसाची हजेरी
आज सकाळपासूनच सोलापूर शहरात ढगाळ वातावरण होतं
त्यानंतर आता पावसाने जोरदार बॅटिंग सुरु केलीय
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पावसबे एका दिवसाची विश्रांती घेऊन पुन्हा पाऊस लागला बरसायला
त्यामुळे पुन्हा सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होईल का अशी शंका निर्माण होत आहे
बंजारा समाजाला हैद्राबाद गॅझेट प्रमाणे आरक्षण मिळावे यासाठी सुसाईड नोट लिहून युवकाची गळफास घेत आत्महत्या
पवन गोपीचंद चव्हाण असं तरुणाचं नाव,आरक्षणासाठी पवनने आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा दावा
धाराशिवच्या मुरूममधील नाईकनगर येथील तरुण,जालना येथील आरक्षण आंदोलनातून परतल्यानंतर तरुणाच दुर्दैवी पाऊल
मयत तरुणाच्या पाश्चात आई-वडील पत्नी आणि दोन मुलं असं कुटुंब
Anc:बंजारा समाजाला हैद्राबाद गॅझेट प्रमाणे अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण मिळावे यासाठी पदवीधर बेरोजगार पवन गोपीचंद चव्हाण वय ३२ याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना धाराशिवच्या मुरूम येथील नाईकनगर येथे घडली आहे.
* नाशिकमध्ये कार चालकाची मुजोरी
* उलट्या दिशेने येत महिलेच्या दुचाकीला दिली धडक
* धडक देत पुन्हा महीलेलाच केली दमदाटी
* वाहतूक पोलिसासमोर कार चालक झाला फरार..
- नाशिकच्या इंदिरानगर बोगदा परिसरात घडला प्रकार
बुलढाणा पोलीस दलातील गायक व किशोर कुमार म्हणून ओळख असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश राजगुरे यांचा आज पहाटेच्या दरम्यान हृदयविकाराने निधन झालं. कोरोना काळात राजेश राजगुरे यांनी कर्तव्यासोबतच अनेक गीते गायली होती व त्यावेळी त्यांना राज्य सरकारकडून सन्मानितही करण्यात आलं होतं. राजेश राजगुरे यांचा आवाज गायक किशोर कुमार यांच्या सारखा असल्याने त्यांना बुलढाणा पोलीस दलात "किशोर कुमार" म्हणून ओळखत होते. आज त्यांच्या निधनाने बुलढाणा पोलीस दलात शोककळा पसरली आहे.
ओबीसी आरक्षणाला धक्का लागला या तणावातून लातूरच्या रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथील भरत कराड या तरुणाने आत्महत्या केली होती, दरम्यान याच गावातील ग्रामस्थांनी आता साखळी उपोषण सुरू केले आहे. हैदराबाद गॅझेट चा GR रद्द करा, ओबीसी आरक्षणमध्ये कोणाचाही समावेश करू नये, बोगस कुणबी प्रमाणपत्र तात्काळ रद्द करा, भरत कराड यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत आणि शासकीय नोकरी द्या या मागणीसह वांगदरी ग्रामस्थ गावात साखळी उपोषण करत आहेत.
खेरवाडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने २५ दिवसांच्या सतत पाठपुराव्यानंतर सोनसाखळी चोरीच्या गंभीर प्रकरणातील इराणी आरोपी मोहम्मद अली फिरोज जाफरी उर्फ मोमो इराणी (वय २३) याला अटक केली आहे. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली रॉयल इनफिल्ड हंटर ३५० मोटारसायकल व वनप्लस मोबाईल असा एकूण ₹१.७० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नाशिकच्या मालेगाव मधील शिक्षण संस्थान मध्ये शिक्षक भरतीच्या घोटाळ्या प्रकरणी नाशिक जिल्हा परिषदेच्या 3 अधिकाऱ्यांना पोलीस कोठडी देण्यात आली होती आज त्यांना न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे,या तिघा अधिकाऱ्यांना नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती,यात आणखी काही आधीकरी अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे
नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवर असलेल्या विंचूर येथे सकाळच्या सत्रात सव्वा तीनशे वाहनातून कांदा विक्रीसाठी आला होता सुरुवातीला गोल्टी व खादीच्या कांद्याचे लिलाव सुरू झाले यावेळी एका शेतकऱ्याच्या कांद्याला दोनशे रुपये प्रति क्विंटलला बाजार भाव पुकारून बीट रिव्हर्स करत शंभर रुपये केली यानंतर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांमुळे दीडशे रुपये प्रति क्विंटल करण्यात आल्यानंतरही शेतकऱ्यांचा संताप अनावरण झाल्याने काही काळ नाशिक- छत्रपती संभाजी नगर राज्य मार्गावर शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केले याची माहिती लासलगाव पोलिसांना मिळतात सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी शेतकऱ्यांची समजूत काढत संतप्त शेतकऱ्यांना बाजार समितीच्या आवारात नेत फेर लिलावाचा तोडगा काढून लिलावाला पूर्ववत सुरुवात करण्यात आली
कल्याणात भाजप महिला आघाडीकडून काँग्रेस विरोधात आंदोलन करण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि त्यांच्या आईशी मिळता जुळत्या एआय व्हिडिओवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे, बिहार कॉंग्रेसच्या अधिकृत पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, त्यानंतर भाजपाने काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा घेत भाजप आमदार सुलभा गायकवाड, महिला जिल्हाध्यक्ष रेखा चौधरी, यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करीत निषेध नोंदवला आहे, कल्याण मध्ये भाजप महिला आघाडीच्या वतीने काटेमानवली नाका येथे काँग्रेसच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले , यावेळी महिला कार्यकर्त्यांनी हातात निषेधाचा फलक घेत माताजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्थान, शरम करो शरम करो काँग्रेस पार्टी शरम करो, महिला के सन्मान मे भाजप मैदान मे अशा जोरदार घोषणाबाजी केली व निषेध व्यक्त केला.
गडचिरोली जिल्हातील प्रमुख शहर असलेल्या चामोर्शी तालुका हा सर्व बाजूने खड्डेमय झाला असून नागरिकांना प्रवास करताना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यातच चामोर्शी- आष्टी, चामोर्शी–मूल, चामोर्शी - घोट मार्गावरील गंभीर खड्ड्यांमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सुरजागड येथून दररोज शेकडो अवजड वाहने कच्चामाल घेऊन या मार्गावरून जात असल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. हा मार्ग गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा मुख्यमंत्री मार्ग असल्याने त्याची दुरुस्ती तात्काळ होणे गरजेचे आहे.
याच पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक व संघटनांनी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांना निवेदन देऊन या मार्गाच्या दुरुस्तीकरिता तात्काळ निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली.
सदर निवेदनावर डॉ. होळी यांनी त्वरित दखल घेत संबंधित विभाग तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्रव्यवहार करून लवकरात लवकर निधी मंजूर व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
लातूरच्या सारोळा येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहारासाठी मागविण्यात आलेल्या तांदळाच्या पोत्याला बुरशी आणि आळ्या आढळून आल्या आहेत, दरम्यान निकृष्ट दर्जाचा शालेय पोषण आहार आल्याने, शिक्षकांनी पोषण आहाराची गाडी परत केली आहे. मागच्या अनेक महिन्यांपासून नियमित चांगल्या दर्जाचा शालेय पोषण आहार मिळत नाही. त्यामुळे अशा निकृष्ट दर्जाच्या आहारामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी धोका निर्माण होऊ शकतो,
पंढरपुरात आज कृत्तिका नक्षत्राच्या सुरुवातीलाच मुसळधार पावसाने हजेरी लावली. सकाळी अर्धा तासाहून अधिक काळ धो धो पाऊस पंढरपूर शहरात कोसळला. त्यामुळे विठ्ठल मंदिर परिसरात आलेल्या भाविकांची मोठी तारांबळ उडाली. तर शहरातील नागरिकांचे मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले दिसून आले.
शिवा संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल केली आहे.याला विरोध म्हणून नांदेडच्या लोहा तालुक्यातील रिसनगाव येथील मराठा समाज बांधवांनी त्यांच्या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या 21 विद्यार्थ्यांचे दाखले मागितले आहेत. तर आता या विरोधात ओबीसी समाज बांधव सुद्धा आक्रमक झाला असून ज्या मराठा संस्था आहेत त्या मराठा संस्थेत आम्ही ओबीसी समाजाचे विद्यार्थी शिकवणार नाहीत अशी भूमिका घेतली आहे. प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी घेतलेली भूमिका ही कायदेशीर आहे असं मत ओबीसी बांधवांनी व्यक्त केल आहे. आरक्षणाच्या लढाईमुळे गावगाड्यातील वातावरण चांगलं तापलं असून मराठा विरुद्ध ओबीसी असावा आता वाद पेटला आहे.
अमरावतीमध्ये राहुल गांधीं यांच्या विरोधात भाजपा महिला मोर्चाचं राजकमल चौकात आंदोलन.....
बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईचा AI व्हिडिओ व्हायरल केल्या प्रकरणी भाजप आक्रमक....
भाजपकडून राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी...
भाजप महिला मोर्चाच्या वतीने काँगेस विरोधात आक्रमक..
आदिवासी बांधवासाठी नर्मदा काठावर आरोग्य सेवा देणाऱ्या बोट रुग्णवाहिका पाहणी दरम्यान चूक...
नर्मदा नदीवर विशाल पात्रावर तरंगणाऱ्या बोट रुग्णवाहिकेत एकही लाइफ जॅकेट नाही....
लाइफ जॅकेट विनाच आरोग्य मंत्रासोबत आमदार आमश्या पाडवी यांच्या जीव धोक्यात घालून प्रवास....
बोट ॲम्बुलन्स मध्ये लाइफ जॅकेट अनिवार्य असताना एकही लाइफ जॅकेट नसल्याचा धक्कादायक प्रकार...
पंढरपूर जवळच्या भीमा सहकारी साखर कारखाना कामारांनी थकीत पगाराच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्या टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्यातील कामगारांचा मागील तीन वर्षांपासून पगार थकीत आहे. शिवाय 68 महिन्यांचा भविष्य निर्वाह निधी ही जमा केला नाही. यासह विविध मागण्यासाठी कामगारांनी कारखाना गेटवर आंदोलन सुरू केले आहे. कामगारांनी कारखाना प्रशासनाच्या विरोधात घोषणी देत थकीत पगार देण्याची मागणी केली आहे.
हिंगोलीत पावसामुळे शेतकरी हवालदिल
मदतीसाठी सरकार कडे याचना करत शेतकरी साम टीव्हीवर ढसाढसा रडला
हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील आरळ ,तेलगाव शिवारात दीड हजार हेक्टर शेती 24 तासांपासून पाण्याखाली
तर गुंडा गावात दोन महिला पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्युमुखी
व्हीआयपी दर्शनाच्या पासच्या किमतीत वाढ, 20 सप्टेंबर पासून नवे दर लागू
दोनशे रुपयांचा देणगी दर्शन पास तीनशे रुपयांना मिळणार, तर पाचशे रुपयांच्या देणगी दर्शन पासची किंमत 1000 रुपये असणार
तसेच स्पेशल गेस्ट रेफरल पासची किंमत ही दोनशे रुपयावरून वाढ होऊन पाचशे रुपये करण्यात आली
शिवाय सकाळच्या अभिषेक पासची संख्या तीनशेवरून चारशे करण्यात आली
तुळजाभवानी मंदिर संस्थान कडून परिपत्रक काढून नवे दर जाहीर करण्यात आले
बस चालकांना बस डेपोत टाकताना आणि बाहेर काढताना होत आहे अडचण..
खड्डे मोठे असल्याने अनेकदा बस चालकांचे सुटते नियंत्रण...
जीव घेण्या खड्ड्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष खड्डे बुजवण्याची बसचालकांची मागणी..
चार मित्रांमध्ये झालेल्या भांडणांत एका मित्राने आपल्या दुसऱ्या मित्राची पुलावरुन नदी पात्रात ढकलून हत्या केल्याची धक्कादायक घटना महाड तालुक्यातील शिवथर येथे घडली आहे. तळशीराम गायकवाड असे मयताचे नाव असून तुषार येनपुरे याने तुळशीराम याची पुलावरून नदीच्या पाण्यात लकटून हत्या केली आणि सोबत असलेल्या मित्रांना जीवे ठार मारण्याचा दम भरल्याचे पोलिस तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुळशीराम गायकवाड, तुषार येनपुरे, रोशन येनपुरे, गणेश सुतार आणि आणखी एक अनोळखी मित्र असे पाच जण कुभे शिवतर येथून आंबे शिवथर येथे किराणामाल घेऊन चालत निघाले होते. यावेळी झालेल्या किरकोळ वादाचे पुर्नवसन मारामारीत झाले. या हत्येची नोंद महाड MIDC पोलिस ठाण्यात करण्यात आली असून या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
काल झालेल्या जोरदार पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत.त्यामुळे गोदावरी नदीपात्राला मोठा पूर आला आहे. गोदावरी नदी पात्रावरील वाजेगाव येथील बंधारा संपूर्ण पाण्याखाली गेलेला असताना तीन तरुणांनी या पुराच्या पाण्यात स्टंटबाजी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जीव धोक्यात घालून हे तिन्ही तरुण आजूबाजूला सर्वत्र पाणी असताना पुराच्या पाण्यात वावरताना पाहायला मिळत आहेत.
अमरावती जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने अमरावती जिल्ह्यात केलेल्या तपासणीत रेशनमध्ये तफावत आढळून आल्याने ५२ रेशन दुकानदार दोषी आढळून आले आहे. यातील १६ दुकाने रद्द करण्यात आली असून एक दुकान निलंबित करण्यात आले आहे. या दुकानदारांना २० लाख १४ हजार १६५ रुपयाचा दंड ठोठाविला आहे.जिल्ह्यात पुरवठा विभागाकडून रेशनकार्डधारकांना सुविधा मिळण्याकरिता त्यांना धान्य मिळण्यास त्रास होवू नये याकरिता विविध पथकांकडून एप्रिल २०२४ ते ऑगस्ट २०२५ या दरम्यान तपासणी मोहिन राबविली होती. यामध्ये १९१६ रेशन दुकानांपैकी १५६१ दुकानांची तपासणी करण्यात आली. याशिवाय ९२ दुकानांमध्ये आकस्मिक भेट देण्यात आली. तर प्राप्त तक्रारीवरुन १३ दुकानांची चौकशी जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांचे आदेशावरुन करण्यात आली. या तपासणीमध्ये ३५ दुकानदार किरकोळ दोषी, एक दुकानदार मध्यम व १६ दुकानदार हे गंभीर दोषी आढळून आले. असे एकुन ५२ रेशन दुकानदार दोषी आढळून आले आहे. त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांनी गंभीर दोषी आढळलेल्या १६ दुकाने रद्द केली असून मध्यम दोषी आढळलेले एक दुकान निलंबीत केले आहे. या सर्व दुकानदारांवर
धनगर आरक्षण एसटी आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित राहिलेला आहे .या मागणीसाठी धनगर समाज बांधव आक्रमक झालेले आहेत. पुणे येथे सर्वपक्षीय सर्व संघटना धनगर समाजाच्या एकत्रित 15 सप्टेंबर 2025 रोजी पत्रकार भवन येथे निर्णायक बैठक घेणार आहेत. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर मेंढरे सोडण्याचे काम येथील धनगर समाज बांधव करेल आणि यशवंत संघर्षनेचे संस्थापक अध्यक्ष यांनी फडणवीस सरकारला इशारा दिलेला आहे. की जर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी नाही झाली तर वर्षा बंगल्यावर एका महिन्याच्या आत आत्मदहन करेल रॉकेल टाकून स्वतःला पेटवून देईल एसटी आरक्षणासाठी अनेक बलिदान झालेले आहेत त्यात अजून एक नवीन बलिदान असेल असा इशारा यशवंत संघर्ष सेनेने दिला आहे.
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा 1220 मिलिमीटर पावसाची नोंद..
चार महिन्यात अडीच लाखावर पर्यटकांची हजेरी..
चिखलदऱ्याचा परिसर पावसामुळे हिरवागार.
चिखलदरा परिसरात अल्लाददायक वातावरण असल्याने सुट्टीच्या दिवसात पर्यटकांची गर्दी वाढली
भीमकुंड धबधबा देखील प्रवाहित झालाय..
अडीच लाख पर्यटक आत्तापर्यंत चिखलदऱ्यात दाखल झाल्याने महानगरपालिकेला 56 लाखाचे उत्पन्न प्राप्त.
परभणी जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस बरसलाय याच पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे याचप्रमाणे शहरातील रेल्वे स्टेशन बाहेरी परिसरात रोडवर पाणी साचल्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्टेशनला जाता येणे कठीण झाले. सकाळच्या सुमारास स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी असते आणि याच ठिकाणी स्टेशनवर जाण्यासाठी परिसरात पाणी झाल्यामुळे पाण्यातून प्रवाशांना वाट काढत स्टेशनमध्ये जावे लागत आहे यामुळे प्रवाशांची चांगली च गैरसोय होताना दिसत आहे
अक्कलकोट तालुक्यात मागच्या दोन दिवसांपासून सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची झाली दैना
सांगोगी - तळेवाडी पुला जवळील रस्ता पूर्णतः खचला
अक्कलकोट तालुक्यात पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने सांगोगी - तळेवाडी पुलावरील सुरक्षाकडे ही तुटले
यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून बोरी नदीवरील पुलावरून करावा लागतोय प्रवास
राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व पंचायत समिती सभापतिपदाचे आरक्षण शुक्रवारी जाहीर केले. त्यानुसार भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पुढील अडीच वर्षांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे. यामुळे सर्वच पक्षांमध्ये इच्छिकांकडून अध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदारी राहणार, असे चित्र आतापासूनच दिसायला लागले आहे.ओबीसी आरक्षणाच्या तिढ्यामुळे भंडारा जिल्हा परिषदेची निवडणूक दि. १२ डिसेंबर २०२१ आणि दि. १९ फेब्रुवारी २०२२ अशी दोन टप्प्यांत झाली होती. ५२ सदस्यांच्या निवडीसाठी झालेल्या या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात ३९ गणांमध्ये, तर दुसऱ्या टप्प्यात १३ गणांमध्ये निवडणूक झाली होती. त्यानंतर दि. १० मे २०२२ तारखेला ही जिल्हा परिषद अस्तित्वात आली होती. पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून त्याची मुदत आता दि. १० मे २०२७ रोजी संपणार आहे.विशेष म्हणजे, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा कार्यकाळ कार्यकाळ एकाच वेळी पूर्ण होत आहे. ओबीसी आरक्षणाच्या तिढ्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागील तीन वर्षापासून लांबणीवर पडल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून, पुढील दोन महिन्यांत या निवडणुका होण्याची शक्यता आहे. ग्रामीण विकास विभागाने शुक्रवारी जाहीर केलेले जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण हे पुढील अडीच वर्षांसाठी लागू होणार आहे.
पॅथॉलॉजिस्ट डॉक्टरांच्या बनावट सही व नोंदणी क्रमांकाचा उपयोग करून विमा कंपनीची दिशाभूल करून लाखो रुपये उकळणाऱ्या चौघांविरुद्ध खामगाव येथील डॉ.ब्रह्मानंद टाले या पॅथॉलॉजिस्ट डॉक्टरांच्या तक्रारीवरून फलटण पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अतिशय धक्कादायक बाब म्हणजे फलटण येथे डॉ. ब्रह्मानंद टाले यांची बनावट सही व नोंदणी क्रमांक वापरून हे भामटे रक्त चाचणीचे रिपोर्टही देत होते. 5 ऑगस्ट 2025 रोजी "बुलेट हेल्थकेअर सर्व्हिसेस फॉर रॉयल सुंदरम हेल्थ इन्शुरन्स" कंपनीचे प्रतिनिधी यांनी खामगाव येथे येऊन डॉ. ब्रह्मानंद टाले यांना काही रक्त चाचणीचे अहवाल दाखवले व हे तुम्ही प्रमाणित केले आहे का..? असं विचारल असता डॉ. ब्रह्मानंद टाले यांना शंका आली व हे रिपोर्ट मी प्रमाणित केले नाही व यावर माझी बनावट स्वाक्षरी व बनावट नोंदणी क्रमांक आहे.
सोशल मीडियावर कधी काय चर्चेला येईल सांगता येत नाही.धाराशिव मध्ये एका पोलिटिकल कॉम्पेनिंगची जोरदार चर्चा आहे. धन्यवाद खा. ओम आम्हाला कळालं.... भाजपकडून ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात हे सोशल मीडियावर कॅम्पेनिंग सुरू आहे.राजकीय विरोधक असलेल्या ओमराजे विरोधात भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या समर्थकांकडून हे कॅम्पेनिंग सुरू असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाल असून चर्चेला उधाण आलं आहे. भाजपला या कॅम्पेनिंग मधून नेमकं म्हणायचे काय याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.नुकत्याच झालेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची पाच मतं फुटल्याचा दावा श्रीकांत शिंदे यांनी केला होता.त्यानंतर धाराशिव मध्ये खासदार असलेल्या ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात भाजपकडून धन्यवाद खासदार ओम म्हणत सुरू केलेले कॅम्पेनिंग चर्चेत आहे.श्रीकांत शिंदे यांचा दावा आणि याचा काही संबंध आहे का ? अशीही एक चर्चा सुरू आहे.दरम्यान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या समर्थकांनी भाजपाने सुरू केलेल्या कॅम्पिंगला बालिशपणा असल्याचं म्हटलय.
राज्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करताच राजकीय पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे.धाराशिव जिल्हा परिषदेवर सलग दुसऱ्यांदा महिलाराज येणार आहे.माञ यावेळी खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी अध्यक्षपद राखीव आहे.जिल्हा परिषद अस्तित्वात आल्यापासून तीन वेळा अध्यपदाची महिलेला संधी मिळाली आहे.त्यामध्ये दोनवेळा आरक्षित प्रवर्गातून तर एक वेळा खुल्या प्रवर्गातुन महीलांनी अध्यपद भुषवले आहे.गटाचे राजकीय आरक्षण जाहीर होताच राजकीय घडामोडींला वेग आला आहे.सोशल मिडियावर महिला नेत्यांमध्ये शर्यत पाहायला मिळणार आहे.समर्थकाकडुन जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पोस्ट व्हायरल होत आहेत तर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या पत्नी ज्योती सावंत यांच्या नावाची पोस्ट देखील भावी अध्यक्षा म्हणून व्हायरल होत आहेत. महायुतीमधील भाजप व शिवसेना शिंदे गट यातील दोन उमेदवार इच्छुक असल्याचे सोशल मिडीयातुन समोर आल आहे.
महाराष्ट्र शासनाने जुलै महिन्यात देशी आणि विदेशी दारूच्या दरात वाढ केल्याचा फटका ऑगस्ट महिन्याच्या विक्रीतून समोर आल आहे. वाशिम जिल्ह्यात विदेशी दारूच्या विक्रीत 16. 69 टक्क्यांनी घट झाली आहे. तर देशी दारूच्या विक्रीत मात्र चार 4 टक्क्याची घट झाल्याचं आकडेवारीतून समोर आला आहे. देशी, विदेशी दारूच्या विक्रीत घट झाली असताना दुसरीकडे मात्र बियरच्या विक्रीत मात्र 17 टक्क्यांनी वाढ झाल्याचं बघायला मिळालं.
वाशिम जिल्ह्यात गतवर्षी ऑगस्ट महिन्यात विदेशी दारूची 1 लाख 12 हजार 390 लिटरची विक्री झाली होती. तर या ऑगस्टमध्ये 93 हजार 636 लिटर ची विदेशी दारू विकल्या गेली. यात तब्बल 18 हजार 754 लिटर दारूच्या विक्रीत घट झाली आहे. यात 16.69 टक्क्यांनी कमी झाली आहे.
सायबर चोरट्यांनी फेब्रुवारी महिन्यात तक्रारदार ज्येष्ठ महिलेशी व्हॉट्सॲपवर संपर्क साधला. महिलेच्या नावाने एका कंपनीची नोंदणी झाल्याचे आणि त्यांच्या नावाचा गैरवापर करून एका बँकेत खाते उघडल्याचे सांगण्यात आले. त्या खात्यातून काळ्या पैशांचा व्यवहार झाल्याचा आरोप करून महिलेस ईडीची कारवाई होणार असल्याची भीती चोरट्यांनी दाखविली. त्यानंतर मनी लाँड्रिंग करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी ज्येष्ठ महिलेकडून बँक खात्याची गोपनीय माहिती मागितली. कारवाई टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील,असे सांगून चोरट्यांनी महिलेला ऑनलाइन रक्कम पाठविण्यास भाग पाडले.
- नागपूर जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसीसाठी राखीव
- यंदा अध्यक्षपद ओबीसी प्रवर्गातील पुरुषांसाठी राखीव
- २०१२ पासून नागपूर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद सलगपणे महिलांकडे आहे
- अध्यक्षपदी वर्णी लागेल म्हणून भाजप आणि कॅाग्रेसमधील अनेक ओबीसी नेत्यांच्या आशा पल्लवीत मोरिचेबांधणी होणार सुरु
- राज्य सरकराने पंचायतराज संस्थांच्या निवडणुकांतील आरक्षण सोडती नुकतीच जाहीर केली
- या सोडतीत नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसीसाठी निश्चित झालेय.
जळगाव सोने-चांदीच्या भावामध्ये वाढ सुरूच असून एकाच दिवसात चांदीच्या भावात तीन हजार रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी एक लाख २९ हजार ५०० रुपयांवर पोहचली. सोन्याच्या भावात ५०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख १० हजार ५०० रुपयांवर पोहचले. ११ सप्टेंबरपर्यंत सोन्याने एक लाख १० हजार रुपयांचा टप्पा गाठला. तर चांदीही सव्वा लाखाच्या पुढे जाऊन ११ सप्टेंबर रोजी एक लाख २६ हजार ५०० रुपयांवर पोहचली. त्यानंतर १२ सप्टेंबर रोजी तर चांदीच्या भावात एकाच दिवसात तीन हजार रुपयांची वाढ झाली व ती एक लाख २९ -- हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली. एक किलो चांदीसाठी आता एक लाख ३३ हजार ३८५ रुपये मोजावे लागणार आहे.
भुसावळ, कौटुंबीक वाद झाल्याने आयान कॉलनीतील रहिवासी सुभान शेख यांची पत्नी माहेरी गेली.सुमारास सासरे व मामा जावायाची घरी समजूत काढण्यासाठी आले. मात्र, जावायाने मामसासरे समद शेख इस्माईल कुरेशी यांचा चाकूने खून केला, तर चाकू हल्ल्यात सासरे शेख जमील शेख शकूर गंभीर जखमी झाले. संशयित सुभान शेख यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.संशयित शुभान शेख याचा चार वर्षांपूर्वी विवाह झाला. त्याचे पत्नीसोबत नेहमीच कौटुंबीक वाद होत असतं. वाद झाले, की पत्नी माहेरी निघून जायची. दोघांत वाद झाल्याने पत्नी माहेरी गेली. जावायाची समजूत काढण्यासाठी शुभानचे मामा व सासरे भुसावळला आले. मात्र, शुभान याने केलेल्या चाकूहल्ल्यात मामा समद शेख इस्माईल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सासरे शेख जमील शेख शकूर गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संशयित शुभान शेख यास ताब्यात घेतले.
अहिल्यानगर जिह्यातील लोणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कोल्हार गावात पोलीस हवालदार रात्री दुकान बंद करण्याच्या नावाखाली दुकानदाराला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय.. तक्रार घेतली जात नाही म्हणून निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा पोलीस ठाण्यात विचारणा करण्यासाठी गेली असता तीला पोलीस ठाण्यातच बेदम मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप होतोय.. या सगळ्या प्रकारामुळे, कायद्याचे रक्षण करणारेच सामान्य जनतेवर गुंडागर्दी करत आहेत का? असा प्रश्न निर्माण झालाय..
- नाशिकच्या रामवाडी परिसरातील धक्कादायक घटना
- महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्याची चैन दोन चोरट्यांनी केली लंपास
- महिलेच्या घरापर्यंत पाठलाग करत थेट घरात घुसून महिलेला लुटलं
- संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
- महिलेने या दोघा चोरट्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न अयशस्वी
- या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरु
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.