बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा सातवा दिवस होता. त्यांची प्रकृतीही ढासळली होती. कर्जमाफीसंदर्भात आज निर्णय झाला नाही तर, १६ तारखेपासून जलत्याग करण्याचा इशाराही कडूंनी दिला होता. दुसरीकडे बच्चू कडूंची प्रकृती ढासळल्यामुळे प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत होतं. सरकारच्या वतीने मंत्री उदय सामंत यांनी बच्चू कडूंची भेट घेऊन त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.
मी शासनाकडून लेखी पत्र आणलं आहे. तुमच्या सर्व मागण्या आम्ही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, मात्र आता बच्चू कडूंनी आपलं आंदोलन मागे घ्यावं, अशी विनंती उदय सामंत यांची बच्चू कडू यांना केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी आग्रह केला म्हणून मी आज आंदोलन मागे घेत आहे, असं बच्चू कडूंनी जाहीर केलं. मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर २ ऑक्टोबरला पुन्हा आंदोलन करू. २ ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं लागेल, अन्यथा सोडणार नाही, असा इशाराही बच्चू कडूंनी दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.