Shreya Maskar
कोकण समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. आता उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबईकरांची पाऊलं आपोआप कोकणाकडे वळतात. कोकणात गेल्यावर तेथील बीचना नक्की भेट द्या.
रत्नागिरी येथे सुंदर मुरुड बीच वसलेला आहे. एक स्वच्छ, लोकप्रिय आणि विस्तीर्ण समुद्रकिनारा म्हणून तो ओळखला जातो. जिथे बनाना राईड आणि जेट स्कीइंगसारख्या अनेक जलक्रीडा उपलब्ध आहेत.
लांब, स्वच्छ मऊ वाळू आणि सौम्य लाटांसाठी दापोलीतील कार्दे बीच ओळखला जातो. येथे सूर्योदय आणि सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. तुम्ही येथे फोटोशूटचा आनंद घेऊ शकता.
लाडघर बीच वैशिष्ट्यपूर्ण रंगामुळे 'लाल वाळूचा समुद्रकिनारा' म्हणून ओळखला जातो. हा समुद्रकिनारा डॉल्फिन दर्शन आणि जलक्रीडांसाठी लोकप्रिय आहे.
आंजर्ले (दापोली) समुद्रकिनाऱ्याजवळ टेकडीवर स्थित सुप्रसिद्ध 'कड्यावरचा गणपती' हे जागृत देवस्थान आहे. येथे पावसाळ्यात निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात केळशी बीच आहे. पांढरी शुभ्र वाळू, नारळ-पोफळीची झाडे आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला हा किनारा गर्दीपासून दूर निवांतपणा शोधणाऱ्यांसाठी उत्तम आहे.
हरनाई बीच हा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली जवळ असलेला एक निसर्गरम्य आणि शांत समुद्रकिनारा आहे, जो त्याच्या सोनेरी वाळू, नारळाच्या बागा आणि ऐतिहासिक सुवर्णदुर्ग किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.