Shreya Maskar
महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात औसा किल्ला आणि उदगीर किल्ला हे दोन महत्त्वाचे किल्ले आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीत येथे नक्की भेट द्या.
औसा किल्ला हा १५-१६ व्या शतकातील 'भुईकोट' (जमिनीवरील) किल्ला असून, त्याची वास्तुकला अद्वितीय अशा तुर्की-युरोपियन शैलीची आहे.
उदगीर किल्ला हा १२ व्या शतकातील वास्तू रचना, किल्ल्याभोवतीचे खोल खंदक आणि मराठे, निजाम यांच्यात झालेल्या तहासाठी प्रसिद्ध आहे.
औसा किल्ला बहामनी राजवटीत महमूद गवान याने इ.स. १४६६ मध्ये बांधला.
औसा किल्ल्यात 'बारादरी' (खांबांचा दालन), राणी महाल, लाल महाल, पाणी महाल आणि 'परी बावडी' सारख्या विविध विहिरींचा समावेश आहे.
उदगीर किल्ला हा चौकोनी आकाराचा असून, तो एका उंच बुरुजांनी वेढलेल्या मजबूत तटबंदीचा (भुईकोट) किल्ला आहे. हा किल्ला मराठे आणि निजाम यांच्यातील ऐतिहासिक युद्धाचा साक्षीदार आहे.
लातूरमध्ये या दोन किल्ल्यांसोबतच खरोसा लेणी, गंज गोलाई, सिद्धेश्वर मंदिर आणि सुरत शावली दर्गा ही प्रमुख ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाणे आहेत. येथे तुम्ही हिवाळा आणि उन्हाळ्यात भेट देऊ शकता.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.