पुणे: चाकण औद्योगिक क्षेत्रातील तुर्णे गावाजवळ प्रस्तावित रेल्वे बायपास प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा विरोध दिवसेंदिवस तीव्र होत आहे. या वादात आता राजकीय स्तरावरही आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, खेड तालुक्यातील आजी आणि माजी आमदारांमध्ये जुंपली आहे.
कुरुळी परिसरातील नागरिकांशी संवाद साधताना आमदार बाबाजी काळेंनी माजी आमदारांवर घणाघात केला. यापूर्वी काय मेले होते का? अशा शब्दांत त्यांनी माजी आमदारांवर प्रहार केला. या वक्तव्यामुळे वातावरण अधिक तापले आहे.
यावर प्रतिक्रिया देताना माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी आमदार काळेंचा समाचार घेतला. तोंडात राम-कृष्ण आणि वागण्यात शिव्या? आम्हालाही जशास तसे उत्तर देता येईल. परंतु अपशब्द वापरून तणाव निर्माण करणे योग्य नाही, अशा शब्दांत मोहिते-पाटील यांनी आमदार काळेंना थेट इशारा दिला. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की रेल्वे बायपास प्रकल्पामुळे त्यांच्या शेतीचा, घराचा आणि उपजीविकेचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे त्यांनी प्रकल्पाला पूर्णतः विरोध दर्शविला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.